आंध्र प्रदेश: तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी दरम्यान ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती मंदिरात बुधवारी वैकुंठ द्वार दर्शन तिकीच केंद्राजवळ झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान ६ भक्तांचा मृत्यू झाला आहे. खरंतर, सकाळपासून हजारोच्या संख्येने भक्तगण वैकुंठ द्वार दर्शन टोकनसाठी तिरूपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर रांगेमध्ये उभे होते. वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खोलण्यात आले आहेत. यामुळे टोकनसाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते.


यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने एकच गोंधळ झाला. या चेंगराचेंगरीदरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. परिस्थिती बिघडत असलताना तिरूपती पोलिसांनी मोर्चा सांभाळला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दर्शनासाठी टोकनच्या रांगेत ४ हजार लोक होते. स्थितीबाबत मंदिर समितीचे चेअरमन बीआर नायडू आपात्कालीन बैठक करत आहेत.


 


मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केले दु:ख


मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरूपतीमध्ये विष्णू निवासमजवळ तिरूमाला श्रीवारी वैकुंठ द्वारामध्ये दर्शनासाठी टोकन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान चार भक्तांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्‍यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्‍यांनी यात जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल माहितीही घेतली.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे