दर्ग्यावर चादर चढवून घरी परतताना तीन तरुणांचा अपघाती मृत्यू

पालघर : राजस्थानमध्ये अजमेर येथील बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून घरी परतत असताना तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आणि चार तरुण गंभीर जखमी झाले. सर्व तरुण पालघर जिल्ह्यातील रहिवासी होते. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला.



दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर तरुण कारने घरी परतत होते. त्यांच्या कारचा गुजरातमध्ये भरुच येथील अंकलेश्वरमध्ये बाकरोल पुलाजवळ बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. वेगाने येणारी आर्टिगा कार ट्रकमध्ये घुसली. या अपघातात आयान बाबा चोगले (रा. मनोर), ताहीर नासिर शेख (रा. पालघर) आणि मुदस्सर अन्सार पटेल (रा. टाकवहाल) या तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला. सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व (रा. काटाळे) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर भरुचमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. क्रेन आणि गॅस कटर या साधनांचा वापर करून जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात अतिशय भीषण होता. यात कारचा चेंदामेंदा झाला. जे वाचले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे, जीवाला धोका आहे; असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातामुळे मध्यरात्री थोडा वेळ अंकलेश्वरमध्ये बाकरोल पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली होती. पण वाहतूक पोलिसांनी लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात प्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग

Pune Water Cut : पुण्यावर पाणीकपातीचे संकट, महापालिकेने दिली माहिती

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटत आहे. अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. या

Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ,

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या