Delhi Assembly Election: आज होणार दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा

नवी दिल्ली: दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या(Delhi Assembly Election) तारखांची आज घोषणा होत आहे. निवडणूक आयोग दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार असून यावेळेस तारखांची घोषणा केली जाणार आहे. दिल्लीतील ७० विधानसभेच्या जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होऊ शकतात.


निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळेसही दिल्लीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सामना पाहायला मिळेल. याआधी सोमवारी निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी जाहीर केली होती. दिल्लीत यावेळेस एकूण १ कोटी ५५ लाख २४ हजार ८५८ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दिल्लीत यावेळेस एकूण १.५५ कोटींपेक्षा अधिक मतदार असतील. यात पुरुष मतदारांची संख्या ८३,४९, ६४५ आणि महिला मतदारांची संख्या ७१, ७३,९५२ इतकी आहे. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १२६१ आहे.


निवडणूक आयोगाने सोमवारी दिल्लीतील मतदाराची शेवटची यादी जाहीर केली होती. यासोबतच मतदार यादीतून मतदारांचे नाव वगळल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर मतदार यादीतून मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला होता.



दिल्लीतील याआधीचा निकाल


दिल्लीमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६० जागा जिंकत सरकार स्थापन केले होते. २०१५च्या निवडणुकी आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीच्या इतिहासात एखाद्या पक्षाने पहिल्यांदाच इतक्या जागा जिंकल्या होत्या.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने