Kokan MHADA : कोकण मंडळाच्या सदनिका नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

मुंबई : मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच घरांसाठी शुक्रवार, ३ जानेवारीपर्यंत अनामत रक्कमेसह १७ हजार ७३ अर्ज दाखल झाले आहेत. आता अर्जविक्रीसाठी अर्थात इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. सोमवारी रात्री ११.५९ वाजता अर्जविक्रीची मुदत संपणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत किती अर्ज दाखल होतात याकडे आता कोकण मंडळाचे लक्ष लागले आहे.


कोकण मंडळाने २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८, १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसह विखुरलेली ११७ घरे अशा एकूण २,२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत १० डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती. मात्र ९ डिसेंबरपर्यंत अनामत रक्कमेसह अंदाजे पाच हजार अर्ज सादर झाल्याने अर्ज विक्री – स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार या प्रक्रियेला २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या मुदतवाढीमुळे २७ डिसेंबरची सोडत २१ जानेवारीवर गेली. दरम्यान मुदत वाढवूनही सोडतीला प्रतिसाद मिळाला नाही. केवळ १३ हजार अर्ज आल्याने अर्जविक्री-स्वीकृतीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. अर्जविक्रीसाठी ६ जानेवारी तर अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी ७ जानेवारी अशी मुदत निश्चित करण्यात आली. आता अर्जविक्रीची, अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक राहिले आहेत. सोमवारी रात्री ११.५९ मिनिटांनी ही मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरा करत अर्ज सादर करावेत असे आवाहन कोकण मंडळाकडून करण्यात आले आहे. दोनदा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.



कारण ११ ऑॅक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली असातनाही आतापर्यंत, ३ जानेवारीपर्यंत २२६४ घरांसाठी केवळ २७ हजार १११ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यातील १७ हजार ०७३ जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. अनामत रकमेसह सादर झालेले अर्जदार सोडतीत सहभागी होतात. त्यामुळे २२६४ घरांसाठी १७ हजार अर्ज ही संख्या अत्यंत कमी आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि