चॅम्पियन्स ट्रॉफीआधी फॉर्ममध्ये मोहम्मद शमी, गोलंदाजी-फलंदाजीत शानदार कामगिरी

  56

मुंबई:भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५मध्ये बंगालच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आता मोहम्मद शमीने ५ जानेवारीला मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ऑलराऊंडर कामगिरी केली.


शमीने आधी ३४ बॉलमध्ये नाबाद ४२ धावांची शानदार खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यानंतर गोलंदाजी करत असताना ८ षटकांमध्ये ४० धावा देत एक विकेटही मिळवला.


शमीच्या ऑलराऊंड खेळाव्यतिरिक्त बंगालला या सामन्यात ६ विकेट्सनी पराभव सहन कराव लागला. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. सामन्यात बंगालने ५० षटकांत ६ बाद २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघाने २० बॉल राखत लक्ष्य गाठले. डाव्या गुडघ्याला सूज असल्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५साठी शमीच्या नावावर विचार करण्यात आला नव्हता.


शमी आता हळू हळू आपल्या लयीमध्ये परतत आहे. जर शमी पूर्णपणे फिट झाला तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५साठी संघात स्थान मिळू शकते. शमी वनडे वर्ल्डकप २०२३ नंतरपासून टीम इंडियाबाहेर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रिड मॉडेलला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. हे सामने पाकिस्तान आणि दुबईत रंगतील.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी