Health: या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे काहीजणांना जास्त वाजते थंडी, तुम्हीही त्यातलेच आहात का?

  63

मुंबई: हिवाळ्यामध्ये थंडी वाजणे हे सामान्य आहे. मात्र प्रमाणापेक्षा अधिक थंडी वाजणे हे ही योग्य नाही. खरंतर, तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त थंडी लागते. त्यांना थोडीशी थंड हवा लागली तरी थंडी वाजते. मात्र तुम्ही विचार केलाय का की असे का होत असेल? काही लोकांना प्रमाणापेक्षा अधिक थंडी वाजते. याचे कारण शरीरामध्ये असलेल्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे


हे व्हिटामिन केवळ एकाच प्रकारचे नाही तर तीन प्रकारचे असतात. शरीरात व्हिटामिन डी, व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे काही लोकांना अधिक थंडी वाजते. व्हिटामिन डी केवळ हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचे नही तर यामुळे शरीराचे तापमानही बॅलन्स राखण्यात मदत होते.


अशातच तुमच्या शरीरात व्हिटामिन डीची कमतरता असेल तर तुम्हाला नॉर्मल लोकांपेक्षा जास्त थंडी वाजू शकते. व्हिटामिन बी१२च्या कमतरतेमुळेही शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. शरीरात रक्ताची कमतरता असणे याचा अर्थ योग्य प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा न होणे. याच कारणामुळे जास्त थंडी वाजू शकते.


व्हिटामिन सीमुळे आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत राखली जाते. जर शरीरात व्हिटामिन सीची कमतरता असेल तर इम्युनिटी कमकुवत होते. इम्युनिटी कमकुवत असल्यास तुम्हाला जास्त थंडी वाजू शकते. इतकंच नव्हे तर खोकला आणि सर्दीचाही त्रास होऊ शकतो.


जर तुम्हाला वाटतं असेल की थंडीच्या दिवसांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाजू नये तर तुम्हाला डाएटमध्ये बदल करावा लागेल. तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये पनीर, दूध, डेअरी उत्पादने, मशरूम, आंबट फळे, पपई, मासे आणि चिकनचा समावेश करावा लागेल.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या