Health: या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे काहीजणांना जास्त वाजते थंडी, तुम्हीही त्यातलेच आहात का?

मुंबई: हिवाळ्यामध्ये थंडी वाजणे हे सामान्य आहे. मात्र प्रमाणापेक्षा अधिक थंडी वाजणे हे ही योग्य नाही. खरंतर, तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त थंडी लागते. त्यांना थोडीशी थंड हवा लागली तरी थंडी वाजते. मात्र तुम्ही विचार केलाय का की असे का होत असेल? काही लोकांना प्रमाणापेक्षा अधिक थंडी वाजते. याचे कारण शरीरामध्ये असलेल्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे


हे व्हिटामिन केवळ एकाच प्रकारचे नाही तर तीन प्रकारचे असतात. शरीरात व्हिटामिन डी, व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे काही लोकांना अधिक थंडी वाजते. व्हिटामिन डी केवळ हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचे नही तर यामुळे शरीराचे तापमानही बॅलन्स राखण्यात मदत होते.


अशातच तुमच्या शरीरात व्हिटामिन डीची कमतरता असेल तर तुम्हाला नॉर्मल लोकांपेक्षा जास्त थंडी वाजू शकते. व्हिटामिन बी१२च्या कमतरतेमुळेही शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. शरीरात रक्ताची कमतरता असणे याचा अर्थ योग्य प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा न होणे. याच कारणामुळे जास्त थंडी वाजू शकते.


व्हिटामिन सीमुळे आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत राखली जाते. जर शरीरात व्हिटामिन सीची कमतरता असेल तर इम्युनिटी कमकुवत होते. इम्युनिटी कमकुवत असल्यास तुम्हाला जास्त थंडी वाजू शकते. इतकंच नव्हे तर खोकला आणि सर्दीचाही त्रास होऊ शकतो.


जर तुम्हाला वाटतं असेल की थंडीच्या दिवसांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाजू नये तर तुम्हाला डाएटमध्ये बदल करावा लागेल. तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये पनीर, दूध, डेअरी उत्पादने, मशरूम, आंबट फळे, पपई, मासे आणि चिकनचा समावेश करावा लागेल.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे