बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ४७ जवानांचा मृत्यू

बलुचिस्तान : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानच्या सुरक्षा पथकाच्या ४७ जवानांचा मृत्यू झाला आणि ३० जवान जखमी झाले. ही माहिती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रसारमाध्यमांना दिली आहे.



माजीद ब्रिगेडने बलुचिस्तानमधील तुर्बत शहरापासून आठ किमी अंतरावरील बेहमन भागात केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानच्या ४७ जवानांचा मृत्यू झाला, असे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रसारमाध्यमांना सांगितले. हल्ला स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी पावणेसहा वाजता झाला. कराची येथून तुर्बतमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयाच्या दिशेने १३ वाहनांचा ताफा जात होता. या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ताफ्यातील एक बस पूर्णपणे नष्ट झाली आणि इतर अनेक वाहनांचे कमी - जास्त प्रमाणात नुकसान झाले.



पाकिस्तान या धक्क्यातून सावरण्याआधीच तालिबानने पाकिस्तान विरोधात कोंकुरसी ही गाइडेड मिसाईल तैनात केल्याचे जाहीर केले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर, रणगाडे, कमी उंचीवरून उडणारी विमानं, युद्धनौका नष्ट करण्यास सक्षम आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई आणखी तीव्र झाली तर कोंकुरसी हे क्षेपणास्त्र तालिबानला पाकिस्तान विरोधात वरचष्मा मिळवून देण्यास सक्षम आहे, असे मत शस्त्रास्त्र अभ्यासक व्यक्त करत आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताना सात बिलियन डॉलरचा आधुनिक शस्त्रांचा साठा सोडून दिला होता. यातील काही शस्त्र लगेच वापरण्यायोग्य स्थितीत होती. तर काही शस्त्र ही डागडुजी करून वापरता येतील अशा स्थितीत होती. तालिबानने या शस्त्रसाठ्याची डागडुजी करून तो वापरण्यायोग्य स्थितीत आणला असल्याचे समजते.
Comments
Add Comment

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले

बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना