OYO Check-In Policy : अविवाहित जोडप्यांना आता OYOमध्ये नो एन्ट्री! सुरु केली 'ही' नवी पॉलिसी

  83

मेरठ : अविवाहित जोडप्यांसाठी (Unmarried couples) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अविवाहित जोडप्यांना ओयो (OYO Room Booking) रुम बुकींग प्रकिया सुखरुपरित्या होत होती. मात्र आता काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ऑनलाइन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म OYOने नवी पॉलिसी सुरु केली आहे. त्यामुळे आता अविवाहित जोडप्यांना OYOमध्ये चेक-इन करण्याची (OYO Check-In Policy) परवानगी दिली जाणार नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, सोबतच OYO ने अन्य सुधारणात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. समाजात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी OYOच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या ही पॉलिसी मेरठमध्ये लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मेरठमध्ये ही पॉलिसी यशस्वी झाली तर इतर शहरांमध्येही हे बदल लागू केले जातील.



चेक-इन करताना कोणती कागदपत्रं आवश्यक?


नव्या पॉलिसीअंतर्गत आता सर्व जोडप्यांना चेक-इन करताना वैध ओळखपत्र आणि लग्नाचा पुरावा देणारी कागदपत्र दाखवावी लागणार आहेत. ही बुकिंग ऑनलाइन असली किंवा सरळ हॉटेलमध्ये जाऊन करावयाची असेल तरीही जोडप्यांना ही कागदपत्रं द्यावी लागतील. तसेच पुरेशी कागदपत्र नसल्यास अशा जोडप्यांचं बुकिंग रद्द केलं जाऊ शकतं.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व