IND vs AUS: कसोटी मालिका जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाला किती मिळाली बक्षिसाची रक्कम?

मुंबई: ऑस्ट्रेलियाने भारताला कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात ६ विकेटनी हरवले. त्यांनी सिडनी कसोटीसह मालिकेवर ३-१ असा कब्जा केला. ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी देण्यात आली. मात्र ही मालिका जिंकल्यानंतर पैसेही मिळतात का?


खरंतर बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून केवळ ट्रॉफीच दिली जाते. यासाठी कोणतीही रक्कम ठरवण्यात आलेली नाही. मात्र एक वेगळाच अँगल आहे. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अथवा क्रिकेट ऑस्ट्रेलिया हवे असल्यास आपल्या खेळाडूंना बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ शकते.


टीम इंडियाचा या मालिकेत पराभव झाला. दरम्यान, त्यांना काहीच मिळणार नाही. मात्र गेल्यावेळेस संघाला जिंकल्यानंतर पैसे मिळाले होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाला ५ कोटी रूपये मिळाले होते.


मात्र यावेळेस ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सध्या यासाठीच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा करण्यात आलेली नाही. भारताने मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता. मात्र त्यानंतरच्या तीन सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. तर एक सामना अनिर्णीत ठरला होता.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय