IND vs AUS: कसोटी मालिका जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाला किती मिळाली बक्षिसाची रक्कम?

  51

मुंबई: ऑस्ट्रेलियाने भारताला कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात ६ विकेटनी हरवले. त्यांनी सिडनी कसोटीसह मालिकेवर ३-१ असा कब्जा केला. ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी देण्यात आली. मात्र ही मालिका जिंकल्यानंतर पैसेही मिळतात का?


खरंतर बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून केवळ ट्रॉफीच दिली जाते. यासाठी कोणतीही रक्कम ठरवण्यात आलेली नाही. मात्र एक वेगळाच अँगल आहे. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अथवा क्रिकेट ऑस्ट्रेलिया हवे असल्यास आपल्या खेळाडूंना बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ शकते.


टीम इंडियाचा या मालिकेत पराभव झाला. दरम्यान, त्यांना काहीच मिळणार नाही. मात्र गेल्यावेळेस संघाला जिंकल्यानंतर पैसे मिळाले होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाला ५ कोटी रूपये मिळाले होते.


मात्र यावेळेस ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सध्या यासाठीच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा करण्यात आलेली नाही. भारताने मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता. मात्र त्यानंतरच्या तीन सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. तर एक सामना अनिर्णीत ठरला होता.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी