IND vs AUS: कसोटी मालिका जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाला किती मिळाली बक्षिसाची रक्कम?

  62

मुंबई: ऑस्ट्रेलियाने भारताला कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात ६ विकेटनी हरवले. त्यांनी सिडनी कसोटीसह मालिकेवर ३-१ असा कब्जा केला. ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी देण्यात आली. मात्र ही मालिका जिंकल्यानंतर पैसेही मिळतात का?


खरंतर बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून केवळ ट्रॉफीच दिली जाते. यासाठी कोणतीही रक्कम ठरवण्यात आलेली नाही. मात्र एक वेगळाच अँगल आहे. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अथवा क्रिकेट ऑस्ट्रेलिया हवे असल्यास आपल्या खेळाडूंना बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ शकते.


टीम इंडियाचा या मालिकेत पराभव झाला. दरम्यान, त्यांना काहीच मिळणार नाही. मात्र गेल्यावेळेस संघाला जिंकल्यानंतर पैसे मिळाले होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाला ५ कोटी रूपये मिळाले होते.


मात्र यावेळेस ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सध्या यासाठीच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा करण्यात आलेली नाही. भारताने मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता. मात्र त्यानंतरच्या तीन सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. तर एक सामना अनिर्णीत ठरला होता.

Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब