गुजरातमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात ३ जण ठार 

अहमदाबाद : गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर काही जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दोन वैमानिकांसह तीन क्रू मेंबर्सचा समावेश आहे. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजता घडली असल्याची माहिती पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथसिंह जडेजा यांनी सांगितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोस्ट गार्डचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर येथे रविवारी नियमित प्रशिक्षण उड्डाण दरम्यान क्रॅश झाले. रविवारी दुपारी 12 वाजता कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टर नेहमीच्या उड्डाणावर होते आणि हेलिकॉप्टर उतरत असताना हा अपघात झाला. लँडिंग दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला.जमिनीवर आदळताच हेलिकॉप्टरला आग लागली आणि धुराचे ढग बाहेर येऊ लागले. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह एकूण तीन जण होते. या अपघातात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता, त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.तसेच हा अपघात का झाला, या मागच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच तटरक्षक दलाचं एक विमान समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातानंतर काही महिन्यातच पश्चिम किनारपट्टीवर ही दुर्घटना घडली आहे.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे