Pooja Sawant Swami Letter : अभिनेत्री पूजा सावंतच स्वामींना खास पत्र!

मुंबई : स्वामींचे भक्त जगभरात आहेत. सेलेब्रिटीही त्यात मागे नाही. अशातच एका अभिनेत्रीने स्वामींना एक खास पत्र लिहलं आहे. मात्र स्वतःसाठी काही न मागता मुक्या प्राण्यांसाठी तिने मागणी केली आहे. दगडी चाळ, क्षणभर विश्रांती अशा अनेक चित्रपटांतून पूजाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.अलीकडेच आलेल्या नाच गो बया या गाण्यातून पूजाने प्रेक्षकांना तिची वेगळीच अदा दाखवली. ही अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली असून तिचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियामद्ये असतो. त्यामुळे पूजा दोन्ही देशांमध्ये आपल काम सांभाळून प्रवास करते. पूजा नेहमीच तीच्या दैनंदिन आयुष्यातील क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करते. अभिनेत्री पूजा सावंतने नुकतच एक पत्र स्वामींसाठी लिहल आहे. या पत्रात तीने स्वामींकडे अनोखी मागणी केली आहे.तिने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला असून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.


काय म्हणाली पूजा सावंत ??


प्रिय स्वामी,


परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली, देवाकडे फेसबुक नाही, इन्स्टाग्राम नाही पण, स्वत:चा पत्ता आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर! खरंच किती दिवस झाले ना पत्र लिहून…म्हणून म्हटलं आज थेट तुम्हालाच पत्र लिहिते. आज मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही. पण, तुमच्या दत्त अवतारात जे पायाशी चौघे उभे आहेत ना, त्यांच्यासाठी मी काहीतरी मागणार आहे. स्वामी, या जगात कोणताही मुका प्राणी जेव्हा संकटात असेल, तेव्हा आपल्यातील कोणीतरी त्यांचा देव बनून त्यांच्या मदतीला जाईल आणि त्या मुक्या प्राण्याला मदत करेल. ही बुद्धी जगातील सर्वांना द्या. तसेच मला एवढं सक्षम करा की, मी या भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही. बाकी सगळं ठीक आहे. सध्या माझा पत्ता बदललाय. पण, मी जगाच्या कुठल्याही भागात असले तरी, मन मोकळं करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवायला तुमचा पत्ता मला सापडला आहे.


तुमचीच पूजा.


मुक्कामपोस्ट देवाचं घर, श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट, जिल्हा – सोलापूर





पूजाच हे भूतदयेवरच प्रेम पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स करत पूजेची पाठ कौतुकाने थोपटली आहे. आगामी काळात पूजा कोणकोणत्या चित्रपटातून झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात