Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये फटाका कारखाना स्फोटात ६ जणांचा मृत्यू

विरुधूनगर : तामिळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यातील सत्तूर भागातील अप्पैया नायक्कनपट्टी येथील साईनाथ फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. विरुधूनगर येथील फटाके निर्मिती कारखान्यात आतापर्यंत ६ मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन आणि बचाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार, स्फोटानंतर कारखान्यातील ४ खोल्या कोसळल्यात. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु फटाके तयार करताना विद्युत गळती किंवा स्फोटकांमधील घर्षणामुळे स्फोट झाला असावा असा संशय आहे. स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाचवण्यात आले आहे आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूतील फटाका कारखान्यांमध्ये यापूर्वी देखील स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. विरुधूनगर जिल्ह्यातच यापूर्वी झालेल्या २ स्फोटाच्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. यातील पहिली घटना रंगापलयम परिसरात झाली होती. याठिकाणी फटाक्यांच्या चाचणीदरम्यान झालेल्या अपघातात १२ महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तामिळनाडू सरकारने मृतकांच्या वारसांना ३ लाख रुपये आणि जखमींच्या उपचारासाठी १ लाखांचा मतद निधी दिला होता.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने