Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये फटाका कारखाना स्फोटात ६ जणांचा मृत्यू

  71

विरुधूनगर : तामिळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यातील सत्तूर भागातील अप्पैया नायक्कनपट्टी येथील साईनाथ फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. विरुधूनगर येथील फटाके निर्मिती कारखान्यात आतापर्यंत ६ मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन आणि बचाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार, स्फोटानंतर कारखान्यातील ४ खोल्या कोसळल्यात. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु फटाके तयार करताना विद्युत गळती किंवा स्फोटकांमधील घर्षणामुळे स्फोट झाला असावा असा संशय आहे. स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाचवण्यात आले आहे आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूतील फटाका कारखान्यांमध्ये यापूर्वी देखील स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. विरुधूनगर जिल्ह्यातच यापूर्वी झालेल्या २ स्फोटाच्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. यातील पहिली घटना रंगापलयम परिसरात झाली होती. याठिकाणी फटाक्यांच्या चाचणीदरम्यान झालेल्या अपघातात १२ महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तामिळनाडू सरकारने मृतकांच्या वारसांना ३ लाख रुपये आणि जखमींच्या उपचारासाठी १ लाखांचा मतद निधी दिला होता.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या