पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा कधी आणि कुठे होणार ?

नवी दिल्ली : पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून भारतात सुरू होत आहे. अंतिम सामने १९ जानेवारी रोजी आहेत. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. या स्पर्धेत २१ देशांचे पुरुष संघ आणि २० देशांचे महिला संघ सहभागी होणार आहेत. पुरुषांची खो खो विश्वचषक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला निळ्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. तर महिलांची खो खो विश्वचषक स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या महिला संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शन येथे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बघता येईल. तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

पुरुष संघ : भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, घाना, केनिया, दक्षिण आफ्रिका,इंग्लंड, नेदरलँड्स, कॅनडा, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया
महिला संघ : भारत, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान, इराण, नेपाळ, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, केनिया, दक्षिण आफ्रिका, युगांडा, पोलंड, इंग्लंड, जर्मनी, पेरू, न्यूझीलंड
Comments
Add Comment

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि