उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी महायुतीच्या वाटेवर ?

रत्नागिरी : बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिकच राहणार असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी यांनी २४ तासातच भाषा बदलली. योग्य वेळी योग्य निर्णय असे म्हणत त्यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले.



उद्धव ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी त्यांच्या भागातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राजापूर आणि लांजा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अन्याय झाला आहे. योग्य निर्णय घ्यावा, अशी भावना उपस्थितांनी राजन साळवी यांच्यापुढे मांडली. यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे राजन साळवींनी जाहीर केले.



निवडणुकीतील माझ्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे; असे राजन साळवी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलले. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे जाहीर केले.



राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेल्या राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. किरण सामंत हे शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत.
Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक