
वाडा : जवस पीक हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. जवस चा उपयोग तेल काढणे आणि धागा निर्मितीसाठी देखील केला जातो. जवस हे पौष्टिक असून, यातून आठ प्रकारची प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. जवस तेलात ५८% ओमेगा तीन, ओमेगा सहा, कोलेस्ट्रॉल आणि ऑटी ऑक्सिड असतात. जवसला बाजारात चांगली मागणी असते. भावही चांगला आहे परंतु वाडा तालुक्यात जवस पीक घेतलं जात नाही एका दुसरा शेतकरी हे पीक घेतो. कृषी विभागाकडून तेलबिया पीक लागवडीकडे शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे पीक घेताना अडचणी येत असल्याने या पिकाकडे पाठ ठेवण्याचे चित्र दिसत आहे.

मोखाडा : तालुक्यातील अतिशय महत्वाचे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असलेले खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मोडकळीस आलेले आहे. येथील ...
जवसला भाव काय? विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात दर आढळून येतात. जवस पिकाला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो. तालुक्यात जवस यातील बियांचे पीक एखात दुसरे शेतकरी घेतात. त्यामुळे या पिकाची पेरणी एकदम अत्यल्प आहे. भाजीपाला, हरभरा, वालाकडे कल असलेले दिसून येत आहे.