थंडीत तुमच्या पायांच्या टाचाही फुटल्यात का? या उपायाने होतील मऊमऊ

मुंबई: थंडीचा मोसम येताच आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होऊ लागतो. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडू लागते. यामुळे त्वचेला एक्स्ट्रा पोषणाची गरज असते. कोरडेपणामुळे त्वचा रूक्ष होऊन ती फाटू लागते. त्वचेतील ड्रायनेस आणि अनेकदा व्हिटामिन बी ३, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे टाचा फुटू लागतात.


जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल तर आज आम्ही तुम्हाला फुटलेल्या, भेगा पडलेल्या टाचा नीट करण्याचे अनेक उपाय आहेत. या उपायांनी तुमच्या टाचा एकदम मऊ मऊ होतील.



मध आणि लिंबू


अँटीसेप्टिक गुणांनी भरपूर असलेले मध आणि लिंबामुळे स्किन मुलायम होते. अशातच तुम्ही एक चमचा मधामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळून टाचांवर लावा. यामुळे भेगा पडलेल्या टाचांपासून आराम मिळेल.


कोरफडीच्या गरामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात. यासोबतच कोरफडीचा जेल एक चांगले मॉश्चरायजर आहे. थंडीत दररोज रात्री टाचांवर कोरफडीचे जेल लावून सॉक्स घालून झोपून जा.



व्हिनेगार आणि मीठाचे पाणी


पाणी गरम करून त्यात मीठ आणि व्हिनेगार टाका. आता यात १० मिनिटांपर्यंत पाय भिजवून ठेवा. असे केल्याने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा नरम होतील.



मेणबत्ती आणि मोहरीचे तेल


फुटलेल्या टाचांवर मेणबत्ती आणि मोहरीचे तेल लावल्यानेही फायदा होतो. मेणबत्ती वितळवून त्यात दोन मोठे चमचे मोहरीचे तेल मिसळा आणि थंड करून फुटलेल्या टाचांवर लावा.



नारळाचे तेल


नारळाचे तेल फाटलेल्या कापलेल्या जागी लावण्याचा सल्ला दिला जातो. ते लावल्याने आराम मिळतो. अशातच दररोज रात्री फुटलेल्या टाचांवर नारळाचे तेल लावणे फायदेशीर मानले जाते.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे