थंडीत तुमच्या पायांच्या टाचाही फुटल्यात का? या उपायाने होतील मऊमऊ

मुंबई: थंडीचा मोसम येताच आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होऊ लागतो. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडू लागते. यामुळे त्वचेला एक्स्ट्रा पोषणाची गरज असते. कोरडेपणामुळे त्वचा रूक्ष होऊन ती फाटू लागते. त्वचेतील ड्रायनेस आणि अनेकदा व्हिटामिन बी ३, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे टाचा फुटू लागतात.


जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल तर आज आम्ही तुम्हाला फुटलेल्या, भेगा पडलेल्या टाचा नीट करण्याचे अनेक उपाय आहेत. या उपायांनी तुमच्या टाचा एकदम मऊ मऊ होतील.



मध आणि लिंबू


अँटीसेप्टिक गुणांनी भरपूर असलेले मध आणि लिंबामुळे स्किन मुलायम होते. अशातच तुम्ही एक चमचा मधामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळून टाचांवर लावा. यामुळे भेगा पडलेल्या टाचांपासून आराम मिळेल.


कोरफडीच्या गरामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात. यासोबतच कोरफडीचा जेल एक चांगले मॉश्चरायजर आहे. थंडीत दररोज रात्री टाचांवर कोरफडीचे जेल लावून सॉक्स घालून झोपून जा.



व्हिनेगार आणि मीठाचे पाणी


पाणी गरम करून त्यात मीठ आणि व्हिनेगार टाका. आता यात १० मिनिटांपर्यंत पाय भिजवून ठेवा. असे केल्याने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा नरम होतील.



मेणबत्ती आणि मोहरीचे तेल


फुटलेल्या टाचांवर मेणबत्ती आणि मोहरीचे तेल लावल्यानेही फायदा होतो. मेणबत्ती वितळवून त्यात दोन मोठे चमचे मोहरीचे तेल मिसळा आणि थंड करून फुटलेल्या टाचांवर लावा.



नारळाचे तेल


नारळाचे तेल फाटलेल्या कापलेल्या जागी लावण्याचा सल्ला दिला जातो. ते लावल्याने आराम मिळतो. अशातच दररोज रात्री फुटलेल्या टाचांवर नारळाचे तेल लावणे फायदेशीर मानले जाते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि