थंडीत तुमच्या पायांच्या टाचाही फुटल्यात का? या उपायाने होतील मऊमऊ

मुंबई: थंडीचा मोसम येताच आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होऊ लागतो. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडू लागते. यामुळे त्वचेला एक्स्ट्रा पोषणाची गरज असते. कोरडेपणामुळे त्वचा रूक्ष होऊन ती फाटू लागते. त्वचेतील ड्रायनेस आणि अनेकदा व्हिटामिन बी ३, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे टाचा फुटू लागतात.


जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल तर आज आम्ही तुम्हाला फुटलेल्या, भेगा पडलेल्या टाचा नीट करण्याचे अनेक उपाय आहेत. या उपायांनी तुमच्या टाचा एकदम मऊ मऊ होतील.



मध आणि लिंबू


अँटीसेप्टिक गुणांनी भरपूर असलेले मध आणि लिंबामुळे स्किन मुलायम होते. अशातच तुम्ही एक चमचा मधामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळून टाचांवर लावा. यामुळे भेगा पडलेल्या टाचांपासून आराम मिळेल.


कोरफडीच्या गरामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात. यासोबतच कोरफडीचा जेल एक चांगले मॉश्चरायजर आहे. थंडीत दररोज रात्री टाचांवर कोरफडीचे जेल लावून सॉक्स घालून झोपून जा.



व्हिनेगार आणि मीठाचे पाणी


पाणी गरम करून त्यात मीठ आणि व्हिनेगार टाका. आता यात १० मिनिटांपर्यंत पाय भिजवून ठेवा. असे केल्याने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा नरम होतील.



मेणबत्ती आणि मोहरीचे तेल


फुटलेल्या टाचांवर मेणबत्ती आणि मोहरीचे तेल लावल्यानेही फायदा होतो. मेणबत्ती वितळवून त्यात दोन मोठे चमचे मोहरीचे तेल मिसळा आणि थंड करून फुटलेल्या टाचांवर लावा.



नारळाचे तेल


नारळाचे तेल फाटलेल्या कापलेल्या जागी लावण्याचा सल्ला दिला जातो. ते लावल्याने आराम मिळतो. अशातच दररोज रात्री फुटलेल्या टाचांवर नारळाचे तेल लावणे फायदेशीर मानले जाते.

Comments
Add Comment

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

Health: वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांनी फिट राहण्यासाठी जरूर खा या ७ गोष्टी

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना चाळीशीनंतर आरोग्याच्या अनेक

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे