Delhi Savarkar Collage : दिल्लीत स्वातंत्र्यवीरांच्या नावाने सुरू होणार महाविद्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संकुलाची पायाभरणी


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार आहे. ३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठा अंतर्गत २ संकुलाची पायाभरणी करणार आहेत. यापैकी एका महाविद्यालयाचे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने असेल.


दिल्ली विद्यापीठात पूर्व आणि पश्चिम असे २ नवे कॅम्पस उभारले जाणार आहेत. यासंदर्भात २०२१ मध्ये दिल्ली विद्यापीठाने निर्णय घेतला होता. त्यानुसार द्वारका आणि नजफगढ भागात ३ महाविद्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. या सर्व प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यात रोशनपुरा, नजफगढ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयचाही समावेश आहे, ज्यामध्ये शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा असतील. यासाठी १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर सुरजमल विहार परिसरात तयार होत असलेल्या शैक्षणिक संकुलासाठी ३७३ कोटी रुपये तर द्वारका भागातील शैक्षणिक संकुलासाठी १०७ कोटी खर्च अपेक्षित आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने बांधलेल्या १६७५ सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबरोबर नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगर येथील जीपीआरए टाईप-२ क्वार्टर्स या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

Comments
Add Comment

Election Commission : वादग्रस्त 'एसआयआर' मोहीम आता 'या' १२ राज्यांत!

बिहारमधील टीकेनंतरही केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; १२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत एसआयआरचा दुसरा

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

लंडन: ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू