Delhi Savarkar Collage : दिल्लीत स्वातंत्र्यवीरांच्या नावाने सुरू होणार महाविद्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संकुलाची पायाभरणी


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार आहे. ३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठा अंतर्गत २ संकुलाची पायाभरणी करणार आहेत. यापैकी एका महाविद्यालयाचे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने असेल.


दिल्ली विद्यापीठात पूर्व आणि पश्चिम असे २ नवे कॅम्पस उभारले जाणार आहेत. यासंदर्भात २०२१ मध्ये दिल्ली विद्यापीठाने निर्णय घेतला होता. त्यानुसार द्वारका आणि नजफगढ भागात ३ महाविद्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. या सर्व प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यात रोशनपुरा, नजफगढ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयचाही समावेश आहे, ज्यामध्ये शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा असतील. यासाठी १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर सुरजमल विहार परिसरात तयार होत असलेल्या शैक्षणिक संकुलासाठी ३७३ कोटी रुपये तर द्वारका भागातील शैक्षणिक संकुलासाठी १०७ कोटी खर्च अपेक्षित आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने बांधलेल्या १६७५ सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबरोबर नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगर येथील जीपीआरए टाईप-२ क्वार्टर्स या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव