Mobile Recharge Fraud : मोबाईल रिचार्ज करताय सावधान! एका झटक्यात होईल खातं रिकामं

मुंबई : सध्या जगभरात सायबर क्राईमचे (Cyber Crime) जाळे मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. हॅकरर्स सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी विविध फ्रॉडचा वापर करत आहेत. अशातच आता अशा नराधमांनी 'फ्री रिचार्ज ऑफर'चा (Mobile Recharge Fraud) नवा घोटाळा सुरु केला आहे.


देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल रिचार्जच्या बनावट ऑफर्सबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या घोटाळेबाज TRAIच्या नावाने मेसेज पाठवत आहेत आणि मोफत रिचार्जच्या नावाखाली फसवणूक करत आहे.



दरम्यान, TRAIने याबाबत कोणतीही ऑफर जारी केली नसल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्याही मोबाईल वापरकर्त्याला रिचार्जशी संबंधित फ्रॉड मेसेज आला असल्यास तातडीने टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



फ्रॉड मेसेजबाबात TRAIच्या उपाययोजना



  • सावध रहा : कोणत्याही संदेशावर त्वरित विश्वास ठेऊ नका.

  • तक्रार नोंदवा : अशा फसव्या संदेशांबाबत सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in किंवा संचार साथी पोर्टल https://sancharsaathi.gov.in वर तक्रार करा.

  • TRAI चा इशारा : TRAI ने आतापर्यंत १ लाखांहून अधिक बनावट संदेशांच्या साच्यांना ब्लॉक केलं आहे, ज्यामुळे अनेक वापरकर्त्यांना फसवणूक होण्यापासून वाचवण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला