Mobile Recharge Fraud : मोबाईल रिचार्ज करताय सावधान! एका झटक्यात होईल खातं रिकामं

मुंबई : सध्या जगभरात सायबर क्राईमचे (Cyber Crime) जाळे मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. हॅकरर्स सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी विविध फ्रॉडचा वापर करत आहेत. अशातच आता अशा नराधमांनी 'फ्री रिचार्ज ऑफर'चा (Mobile Recharge Fraud) नवा घोटाळा सुरु केला आहे.


देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल रिचार्जच्या बनावट ऑफर्सबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या घोटाळेबाज TRAIच्या नावाने मेसेज पाठवत आहेत आणि मोफत रिचार्जच्या नावाखाली फसवणूक करत आहे.



दरम्यान, TRAIने याबाबत कोणतीही ऑफर जारी केली नसल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्याही मोबाईल वापरकर्त्याला रिचार्जशी संबंधित फ्रॉड मेसेज आला असल्यास तातडीने टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



फ्रॉड मेसेजबाबात TRAIच्या उपाययोजना



  • सावध रहा : कोणत्याही संदेशावर त्वरित विश्वास ठेऊ नका.

  • तक्रार नोंदवा : अशा फसव्या संदेशांबाबत सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in किंवा संचार साथी पोर्टल https://sancharsaathi.gov.in वर तक्रार करा.

  • TRAI चा इशारा : TRAI ने आतापर्यंत १ लाखांहून अधिक बनावट संदेशांच्या साच्यांना ब्लॉक केलं आहे, ज्यामुळे अनेक वापरकर्त्यांना फसवणूक होण्यापासून वाचवण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत