Mobile Recharge Fraud : मोबाईल रिचार्ज करताय सावधान! एका झटक्यात होईल खातं रिकामं

मुंबई : सध्या जगभरात सायबर क्राईमचे (Cyber Crime) जाळे मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. हॅकरर्स सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी विविध फ्रॉडचा वापर करत आहेत. अशातच आता अशा नराधमांनी 'फ्री रिचार्ज ऑफर'चा (Mobile Recharge Fraud) नवा घोटाळा सुरु केला आहे.


देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल रिचार्जच्या बनावट ऑफर्सबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या घोटाळेबाज TRAIच्या नावाने मेसेज पाठवत आहेत आणि मोफत रिचार्जच्या नावाखाली फसवणूक करत आहे.



दरम्यान, TRAIने याबाबत कोणतीही ऑफर जारी केली नसल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्याही मोबाईल वापरकर्त्याला रिचार्जशी संबंधित फ्रॉड मेसेज आला असल्यास तातडीने टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



फ्रॉड मेसेजबाबात TRAIच्या उपाययोजना



  • सावध रहा : कोणत्याही संदेशावर त्वरित विश्वास ठेऊ नका.

  • तक्रार नोंदवा : अशा फसव्या संदेशांबाबत सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in किंवा संचार साथी पोर्टल https://sancharsaathi.gov.in वर तक्रार करा.

  • TRAI चा इशारा : TRAI ने आतापर्यंत १ लाखांहून अधिक बनावट संदेशांच्या साच्यांना ब्लॉक केलं आहे, ज्यामुळे अनेक वापरकर्त्यांना फसवणूक होण्यापासून वाचवण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी