Mobile Recharge Fraud : मोबाईल रिचार्ज करताय सावधान! एका झटक्यात होईल खातं रिकामं

मुंबई : सध्या जगभरात सायबर क्राईमचे (Cyber Crime) जाळे मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. हॅकरर्स सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी विविध फ्रॉडचा वापर करत आहेत. अशातच आता अशा नराधमांनी 'फ्री रिचार्ज ऑफर'चा (Mobile Recharge Fraud) नवा घोटाळा सुरु केला आहे.


देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल रिचार्जच्या बनावट ऑफर्सबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या घोटाळेबाज TRAIच्या नावाने मेसेज पाठवत आहेत आणि मोफत रिचार्जच्या नावाखाली फसवणूक करत आहे.



दरम्यान, TRAIने याबाबत कोणतीही ऑफर जारी केली नसल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्याही मोबाईल वापरकर्त्याला रिचार्जशी संबंधित फ्रॉड मेसेज आला असल्यास तातडीने टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



फ्रॉड मेसेजबाबात TRAIच्या उपाययोजना



  • सावध रहा : कोणत्याही संदेशावर त्वरित विश्वास ठेऊ नका.

  • तक्रार नोंदवा : अशा फसव्या संदेशांबाबत सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in किंवा संचार साथी पोर्टल https://sancharsaathi.gov.in वर तक्रार करा.

  • TRAI चा इशारा : TRAI ने आतापर्यंत १ लाखांहून अधिक बनावट संदेशांच्या साच्यांना ब्लॉक केलं आहे, ज्यामुळे अनेक वापरकर्त्यांना फसवणूक होण्यापासून वाचवण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत