पुण्याच्या पर्यटकाचा काशीदच्या समुद्र किनारी बुडून मृत्यू

मुरुड : काशीद समुद्र किनारी पोहताना प्रतिक प्रकाश सहस्रबुद्धे या ३१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना जैनवाडी जनता वसाहत, साईबाबा मंदिराजवळ घडली. पर्यटक सहस्रबुद्धे मित्रांसह पुण्याहून काशीदला आला होता. ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने पुन्हा एकदा पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील पर्यटक काल थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी भाड्याने रिक्षा घेऊन प्रतिक प्रकाश सहस्रबुद्धे, गणेश नितिन सहस्रबुद्धे, रिक्षा चालक -शदाब अविद मलीक, राकेश राजु पवार हे चौघे मित्र फिरण्यासाठी आले होते. दुपारच्या दरम्यान चौघे मित्र समुद्राच्या पाण्यात पोहण्यास उतरले होते. पोहुन झाल्यानंतर स्पोर्ट बाईकवर फिरु असा बेत ठरला त्याकरिता आपल्या गाडीतुन पैसे आणण्याकरिता बाहेर आले आणि प्रतिक सहस्रबुद्धे हा पाण्यात पोहत राहिला. तिघांना वाटलं की प्रतिक ही पाण्यातुन बाहेर आला असेल आणि कुठे तरी फिरत असेल. दिड तासानंतर प्रतिक सहस्रबुद्धे हा पाण्यात तरंगताना लाईफ गार्ड यांना दिसला ताबडतोब घटनास्थळी असलेले पोलिस व लाईफ गार्ड समुद्राच्या पाण्यात उतरून प्रतिक सहस्रबुद्धे यांना बाहेर काढले. परंतु, प्रतिक हा प्रतिसाद देत नसल्याने त्यास पोलिसांनी ताबडतोब मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्रतिक सहस्रबुद्धे हे आधीच मयत झाले आहेत असे डॉक्टर यांनी सांगितले. ही माहिती मिळताच मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख व पोलीस हवालदार -हरि मेंगाळ घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात मुरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास मुरुड ठाण्याचे पोलीस हवालदार- हरि मेंगाळ हे करीत आहेत.
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य