Happy New Year 2025: वेलकम २०२५, भारतासह जगभरात नववर्षाचे उत्साहात स्वागत

मुंबई: जुने वर्ष२०२४ला गुडबाय करताना २०२५ या वर्षाचे जोरदार स्वागत झाले आहे. नवीन वर्षाचा उत्साह, जुन्या गोष्टी मागे सारून आणि उज्ज्वल भविष्यासह पुढे जाण्याची ही वेळ आहे. जगातील विविध भागांमध्ये वेगवेगळा टाईमझोन असल्याने प्रत्येक देशाचे नवे वर्ष हे विविध वेळी सुरू होते. भारताच्या आधी ४१ देश असे आहेत जे नववर्ष आधी साजरे करतात.


देशभरातही नववर्षाचा उत्साह आहे. २०२४ हे वर्ष मागे सारून आता २०२५ या वर्षात आपण प्रवेश करत आहोत. देशात नवीन वर्षाचा मोठा उत्साह आहे. नव्या वर्षाची सुरूवात भक्तीमय व्हावी यासाठी देशातील विविध मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. अनेकजण वर्षाचा पहिला दिवस हा देवाच्या दर्शनाने सुरू करतात. त्यामुळेच मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.



काश्मीर, हिमाचल प्रदेश, झारखंडपासून ते आसाम आणि दक्षिण भारताच्या कन्याकुमारीपर्यंत अत्यंत हर्षोल्लोसात हे नवीन वर्ष साजरे केले जात आहे. पंजाबमधील सुवर्णमंदिरातही लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी पार्ट्या करून, केक कापून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.


अनेक ठिकाणी नववर्षाच्या पार्टीसाठी डिजे, म्युझिकची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तरूणाईचा या नववर्षाच्या पार्टीमध्ये सहभाग असतो.



पंतप्रधान मोदींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष सर्वांना नव्या संधी, यश आणि भरपूर आनंदाचे जावो. तसेच सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो असे त्यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च