Happy New Year 2025: वेलकम २०२५, भारतासह जगभरात नववर्षाचे उत्साहात स्वागत

मुंबई: जुने वर्ष२०२४ला गुडबाय करताना २०२५ या वर्षाचे जोरदार स्वागत झाले आहे. नवीन वर्षाचा उत्साह, जुन्या गोष्टी मागे सारून आणि उज्ज्वल भविष्यासह पुढे जाण्याची ही वेळ आहे. जगातील विविध भागांमध्ये वेगवेगळा टाईमझोन असल्याने प्रत्येक देशाचे नवे वर्ष हे विविध वेळी सुरू होते. भारताच्या आधी ४१ देश असे आहेत जे नववर्ष आधी साजरे करतात.


देशभरातही नववर्षाचा उत्साह आहे. २०२४ हे वर्ष मागे सारून आता २०२५ या वर्षात आपण प्रवेश करत आहोत. देशात नवीन वर्षाचा मोठा उत्साह आहे. नव्या वर्षाची सुरूवात भक्तीमय व्हावी यासाठी देशातील विविध मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. अनेकजण वर्षाचा पहिला दिवस हा देवाच्या दर्शनाने सुरू करतात. त्यामुळेच मंदिरांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.



काश्मीर, हिमाचल प्रदेश, झारखंडपासून ते आसाम आणि दक्षिण भारताच्या कन्याकुमारीपर्यंत अत्यंत हर्षोल्लोसात हे नवीन वर्ष साजरे केले जात आहे. पंजाबमधील सुवर्णमंदिरातही लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी पार्ट्या करून, केक कापून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.


अनेक ठिकाणी नववर्षाच्या पार्टीसाठी डिजे, म्युझिकची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तरूणाईचा या नववर्षाच्या पार्टीमध्ये सहभाग असतो.



पंतप्रधान मोदींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष सर्वांना नव्या संधी, यश आणि भरपूर आनंदाचे जावो. तसेच सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो असे त्यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी