Ratnagiri : रत्नागिरीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी २० कोटीचा निधी मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराला नैसर्गिक उताराने पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यासाठी २० कोटींहून अधिकचा निधी एमआयडीसीने दिला असून, पाटबंधारे विभागाकडून यावर लक्ष ठेवले जाणार आहे.


या दुरुस्तीमुळे ०.३४१ दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे. पानवल धरणाच्या ६० वर्षांनंतर दुरुस्तीला सुरुवात झाली. सध्या या धरणाला ५० टक्क्यांच्या वर गळती आहे. धरण धोकादायक बनल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक होती. या धरणाच्या मजबुतीसाठी २० कोटींचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू झाले आहे. पानवल धरण १९६५ ला बांधले आहे. शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणापैकी हे एक आहे. रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरण व नाचणे तलाव या तीन जलस्रोतांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील साठा दरवर्षी फेब्रुवारीअखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असते. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची कसरत पालिका प्रशासनाला करावी लागते. सुधारित पाणीपुरवठा योजनेमुळे गळती कमी झाल्याने ताण कमी झाला आहे. परंतु शीळ धरणातील पाण्याच्या मर्यादित साठ्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्याची मोठी चिंता आहे.



शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर पानवल धरण आहे. हे धरण १९५२ मध्ये मंजूर झाले. १९६५ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले होते. विजेसाठी एकही रुपया खर्च न करता केवळ नैसर्गिक उताराच्या आधाराने शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे एकमेव धरण आहे. पानवल धरणातील पाणी नैसर्गिक उताराच्या आधाराने नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते. शुद्धीकरण करून ते नागरिकांना पुरवले जाते. पानवल धरणातून शहराची पूर्ण गरज भागत नाही; परंतु काही महिने विनाखर्च शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण खूप उपयोगी मानले जाते. पानवल धरणात ५१८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या पाण्याचा वापर नागरिकांकरिता सहा महिने केला जातो. त्या कालावधीत शीळ धरणातून पाण्याची उचल कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे पालिकेच्या वीज बिलात मोठी कपात होते. या धरणाच्या दुरुस्तीचे काम निर्माण ग्रुपने घेतले असून, वर्षाची त्याला मुदत दिली आहे; परंतु मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

TCS Nashik Case : मी देवाचे आभार मानते, टीसीएसमध्ये सहा वर्षे काम करुनही मी जिवंत; महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

नाशिक : नाशिकच्या टीसीएस या कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण ( Conversion and sexual abuse) या प्रकरणाची सध्या नाशिकच नव्हे

Ashok Kharat : भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर, फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, नशेत... ; सीएचा अशोक खरातविरोधात धक्कादायक खुलासा

नाशिक : स्वतःला दैवी अवतार सांगणारा भोंदू अशोक खरात यांच्या गळाचा आता आणखी आवळला जाणार आहे कारण याप्रकरणाच्या

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok