संतोष देशमुख हत्येतील सर्व दोषी फासावर लटकेपर्यंत कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

  96

देशमुखांच्या भावाशी फोनवरून केली चर्चा


मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख(santosh deshmukh) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान सगळे दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडच्या प्रकरणात कोणालाही आम्ही सोडणार नाही, ज्यांचे संबंध या प्रकरणात आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचं राज्य मी चालू देणार नाही, कोणालाही पैसा, खंडणी मागता येणार नाही. तसेच या प्रकरणाचा तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड याला शरणागती पत्करावी लागली आहे, असेही फडणवीस म्हणाले.


जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळी पथकं कामी लागलेली आहेत आणि कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. संतोष देशमुख यांच्या भावाशी माझी फोनवरुन चर्चा झाली आहे, त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे, काळजी करुन नका. काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तो पर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील हे आश्वासन मी दिलं आहे. तर संयशित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर कोणती कारवाई होईल ते पोलिस तपास करुन ठरवतील आणि जे जे पुरावे आहे त्याच्या आधारावर कोणालाही सोडलं जाणार नाही. आम्ही जाणीवपूर्वक केस सीआयडीला दिली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.


दरम्यान विरोधकांकडून होत असलेल्या टिकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिले. कोणीही काही म्हणत असलं तरी पोलीस पुराव्याच्या आधारानुसार कारवाई करतील. त्यामुळे विरोधक काय बोलतायत हा विषयच नाही. कोणाकडे पुरावे असतील त्यांनी द्या, माझ्या करिता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांचा शिक्षा होणं महत्त्वाचं आहे, काही लोकांना राजकारण महत्वाचं आहे. त्यांच राजकारण त्यांना लखलाभ त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही, काय फायदा होईल मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा, असं फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

जरांगेंनी उपोषण सोडले, फडणवीस सरकारने ६ मागण्या केल्या मान्य; मराठ्यांचा विजय

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. जरांगे यांनी मंगळवारी पाच दिवसांपासून सुरु

मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती, गर्डरचे काम पूर्ण

मुंबई : बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले.

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या

जरांगेंचा मोठा विजय... हैदराबाद गॅझेट लागू होणार; सर्व मागण्या झाल्या मान्य!

राज्य सरकार कडून जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या

Maratha Reservation: विखे पाटील अंतिम मसुदा घेऊन जरांगेंना भेटले, आजच होणार मोठा निर्णय!

मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आमरण

भगव्याच्या मदतीला हिरवे?... "जरांगेना पोलिसांनी हाथ लावल्यास मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल" जलील यांचा मुंबई पोलिसांना इशारा!

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत