WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने घेतली झेप, भारताची घसरण

मेलबर्न : बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील मेलबर्न कसोटी गमावलेल्या भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये घसरण झाली. मेलबर्नची कसोटी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये झेप घेतली.



वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानी आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी सामना रंगेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.



दक्षिण आफ्रिकेने ११ पैकी ७ कसोटी सामने जिंकले आणि एक अनिर्णित राखला. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे प्रमाण ६६.६७० टक्के आहे. विजयाची सर्वाधिक टक्केवारी असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा सामना कोणाशी होणार हे लवकरच ठरणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची बाजू भारतापेक्षा जास्त वरचढ दिसत आहे.



ऑस्ट्रेलियाने १६ पैकी १० कसोटी सामने जिंकले आणि दोन अनिर्णित राखले. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे प्रमाण ६१.४६० टक्के आहे. भारताने १८ पैकी ९ कसोटी सामने जिंकले आणि दोन अनिर्णित राखले. यामुळे भारताच्या विजयाचे प्रमाण ५२.७८० टक्के आहे. इतर कसोटी दर्जा प्राप्त संघांच्या विजयाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना