Tarapur Fire : तारापूरमध्ये भीषण आग; तीन कारखान्यांना आगीची झळ!

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्याला भीषण आग (Tarapur Fire) लागली. या आगीत रासायनिक कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून आगीची झळ बाजूच्या इतर दोन कारखान्यांना लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील आठ अग्निशमन दलांच्या जवानांचे प्रयत्न सुरू असून सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.


तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक के -६ वरील यु.के. अरोमॅटिक्स आणि केमिकल्स प्रा. लि. या सुगंधी द्रव्य बनविणाऱ्या कारखान्याला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रथम आग लागली. या कारखान्यात बनवण्यात येणारी उत्पादने आणि कच्चामाल हा ज्वलनशील असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आगीच्या तीव्रतेमुळे यु.के. ॲरोमॅटिक्स कंपनीसह बाजूला असलेल्या श्री केमिकल्स आणि आदर्श टेक्सटाईल्स या आणखी दोन कंपन्या देखील आगीच्या भक्षस्थानी सापडल्या.



आग लागताच यु. के. ॲरोमॅटिक्स तसेच बाजूच्या सर्व कंपन्यांमधील कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही. जिवीतहानी झाली नाही. मात्र कारखान्यांना आगीची झळ पोचून मोठे नुकसान झाले आहे.


आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन, वसई विरार महानगरपालिका, पालघर नगर परिषद, अदानी पावर, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या एकूण आठ बंबांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असून ज्वलनशील पदार्थांमुळे आग नियंत्रणात आणण्यास अडथळे येत होते. घटनास्थळी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. बोईसर पोलिसांनी आग लागलेल्या कारखान्यांचा परिसर बंद केला आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नालासोपारा ड्रग्ज कारखाना प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

वसई : मुंबई पोलिसांनी कारवाई करत नालासोपारा येथे ड्रग्जचा अवैध ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईनंतर

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता