ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे : ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष नंतर ठाणे महापालिका झाल्यावर या मनपाचे पहिले महापौर झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान (८५) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ठाण्यात सतीश प्रधान यांचे अंत्यदर्शन घेतले.



सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात १९८० मध्ये ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना झाली. शिवसेनेचे माजी खासदार, ठाणे महापालिकेचे पहिले महापौर, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात ठाणे शहरात महापौर मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली. सतीश प्रधान यांच्या नेतृत्वात ठाणे शहरात अनेक विकासकामं झाली. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करण्याचे कामंही सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात झाले.



शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांच्या पश्चात मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असे कुटुंब आहे.
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र