ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे : ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष नंतर ठाणे महापालिका झाल्यावर या मनपाचे पहिले महापौर झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान (८५) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ठाण्यात सतीश प्रधान यांचे अंत्यदर्शन घेतले.



सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात १९८० मध्ये ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना झाली. शिवसेनेचे माजी खासदार, ठाणे महापालिकेचे पहिले महापौर, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात ठाणे शहरात महापौर मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली. सतीश प्रधान यांच्या नेतृत्वात ठाणे शहरात अनेक विकासकामं झाली. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करण्याचे कामंही सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात झाले.



शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांच्या पश्चात मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असे कुटुंब आहे.
Comments
Add Comment

Municipal Corporation : पीओपींच्या गणेश मूर्तींबाबत महापालिकेने भूमिका स्प्ष्ट करावी2

स्थायी समितीत सदस्यांनी मागणी विसर्जित गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प खर्चाला मान्यता मुंबई : 

Ritu Tawade : प्रत्येक मुंबईकरांने एक झाड लावावे

मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली

MLA Amit Satam: हत्तीच्या पिंजऱ्याच्या जागेवर बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरोंग

आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांना पत्र* मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष

Police Character certificate : फेरीवाल्यांना क्यु आर कोड देताना पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र तपासा

भाजपचे तिवाना यांची स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयादवारे मागणी मुंबई : मुंबई महानगरपालिकेमार्फत

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे