ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे : ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष नंतर ठाणे महापालिका झाल्यावर या मनपाचे पहिले महापौर झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान (८५) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ठाण्यात सतीश प्रधान यांचे अंत्यदर्शन घेतले.



सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात १९८० मध्ये ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना झाली. शिवसेनेचे माजी खासदार, ठाणे महापालिकेचे पहिले महापौर, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात ठाणे शहरात महापौर मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली. सतीश प्रधान यांच्या नेतृत्वात ठाणे शहरात अनेक विकासकामं झाली. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करण्याचे कामंही सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात झाले.



शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांच्या पश्चात मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असे कुटुंब आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली