एआयचा वापर करून रस्ता सुरक्षा वाढविण्यावर भर

पुढील १०० दिवसांमध्ये परिवहन विभागाने करावयाच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई : परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई. व्ही. पॉलिसी घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा. त्याचबरोबर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर इंजिनियरिंग सोल्यूशन शोधून काढावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिल्या.


राज्यात परिवहन सेवेला अधिक गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर जुनी १३ हजार शासकीय वाहने भंगारात काढली जावी, अशी सूचना करून मुख्यमंत्री म्हणाले की, टॅक्सी, ऑटो, शहर बस सेवेचे तिकीट दरासंदर्भात निर्णय घेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. वडसा-गडचिरोली तसेच सोलापूर-उस्मानाबाद येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्याची सूचना केली. राज्य परिवहन सेवेच्या १५ वर्षे झालेल्या बसेस भंगारात टाकून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. बसविण्यात यावी जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. यावेळी बंदरे तसेच विमानतळ प्राधिकरण आदिबाबतची चर्चा करण्यात आली.



सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Dharavi Redevelopmen : सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास

मुंबई : सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा.

Chief Minister Devendra Fadnavis : राज्यातील रेल्वेमार्ग फाटकमुक्त होणार

 मुख्यमंत्र्यांचे 'महारेल'ला आदेश; पहिल्या टप्प्यात १३१ पैकी ६५ उड्डाणपुलांच्या कामांना मान्यता मुंबई :

Monsoon Weather Update : अरबी समुद्रात कमी दाबाचे संकट! चक्रीवादळाची शक्यता; मुंबईत मान्सून कधी धडकणार?

मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनाची जोरदार चाहूल लागली असतानाच अरबी समुद्रातील हवामानातील घडामोडींनी हवामान

Nitesh Rane : मटका, जुगारासह ऑनलाइन गेमिंगवर कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घ्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामे व कायदा-सुव्यवस्थेचा घेतला

Dadar’s Plaza Cinema Bus Accident : दादरमधील 'बेस्ट' बसच्या भीषण अपघाताचा थरार; अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर

मुंबई : दादरच्या अत्यंत वर्दळीच्या प्लाझा (Dadar Plaaza Cinema) सिनेमा परिसरात एका भरधाव 'बेस्ट' बसचे (Best Bus Accident) नियंत्रण

New Navi Mumbai-Sindhudurg flight service : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; 'फ्लाय-९१' विमान कंपनी देणार सेवा MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची