वैवाहिक जीवन राहील आनंदी, जोडप्यांनी लक्षात ठेवा या ३ गोष्टी

  59

मुंबई: लग्न हे एक असे बंधन आहे जे मजबूत ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रेम आणि सन्मानाची गरज असते. लग्नाच्या नात्यात विश्वास आणि पारदर्शकता महत्त्वाची असते. एकमेकांशी खुलेपणाने बोलणे आणि आपल्या भावना एकमेकांशी शेअर करणे खूप गरजेचे आहे. वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी पती आणि पत्नी दोघांनाही प्रयत्न करणे गरजेचे असते. खासकरून अशा काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते ज्यामुळे नाते अधिक मजबूत होईल.



छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका


लग्नानंतर पती-पत्नी २४ तास एकमेकांसोबत असतात अशातच त्यांच्यात थोडे बेबनाव होणे स्वाभाविकच आहे. मात्र एकमेकांचे बोलणे मनावर घेतले तर गोष्टी वाढतात. असे सतत केल्याने तुमचे नाते बिघडू शकते आणि दोघांच्या नात्यात तणाव येऊ शकतो. यासाठी लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि आपसात प्रेम वाढू द्या.



असहमतीचे स्वागत करा


कधी कधी असे घडते की जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याशी सहमत नसते. अशातच त्याच्या असमहतीचेही स्वागत केले पाहिजे. तसेच समोरच्याचे ऐकून घेतला पाहिजे. आपल्या जोडीदाराने आपल्याशी सहमतच झाले पाहिजे हे गरजेचे नाही. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत एकमेकांपेक्षा वेगळी असते. जर एखाद्या गोष्टीवरून वाद झाला असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवर आरोप लावू नका.



एकमेकांच्या वाढीला प्रोत्साहन द्या


वैवाहिक जीवनात एका जोडीदाराने नेहमी दुसऱ्या प्रती जबाबदार असले पाहिजे. नेहमी त्याचे करिअर, आरोग्य आणि प्रत्येक कामासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ही दोघांची जबाबदारी आहे की त्यांनी एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तुमच्या जोडीदाराचीही काही स्वप्ने असतील जी पूर्ण करणे दोघांची जबाबदारी आहे. लग्नानंतर जोडीदाराचे स्वप्न आपले बनवा.

Comments
Add Comment

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.