वैवाहिक जीवन राहील आनंदी, जोडप्यांनी लक्षात ठेवा या ३ गोष्टी

  48

मुंबई: लग्न हे एक असे बंधन आहे जे मजबूत ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रेम आणि सन्मानाची गरज असते. लग्नाच्या नात्यात विश्वास आणि पारदर्शकता महत्त्वाची असते. एकमेकांशी खुलेपणाने बोलणे आणि आपल्या भावना एकमेकांशी शेअर करणे खूप गरजेचे आहे. वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी पती आणि पत्नी दोघांनाही प्रयत्न करणे गरजेचे असते. खासकरून अशा काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते ज्यामुळे नाते अधिक मजबूत होईल.



छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका


लग्नानंतर पती-पत्नी २४ तास एकमेकांसोबत असतात अशातच त्यांच्यात थोडे बेबनाव होणे स्वाभाविकच आहे. मात्र एकमेकांचे बोलणे मनावर घेतले तर गोष्टी वाढतात. असे सतत केल्याने तुमचे नाते बिघडू शकते आणि दोघांच्या नात्यात तणाव येऊ शकतो. यासाठी लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि आपसात प्रेम वाढू द्या.



असहमतीचे स्वागत करा


कधी कधी असे घडते की जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याशी सहमत नसते. अशातच त्याच्या असमहतीचेही स्वागत केले पाहिजे. तसेच समोरच्याचे ऐकून घेतला पाहिजे. आपल्या जोडीदाराने आपल्याशी सहमतच झाले पाहिजे हे गरजेचे नाही. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत एकमेकांपेक्षा वेगळी असते. जर एखाद्या गोष्टीवरून वाद झाला असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवर आरोप लावू नका.



एकमेकांच्या वाढीला प्रोत्साहन द्या


वैवाहिक जीवनात एका जोडीदाराने नेहमी दुसऱ्या प्रती जबाबदार असले पाहिजे. नेहमी त्याचे करिअर, आरोग्य आणि प्रत्येक कामासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ही दोघांची जबाबदारी आहे की त्यांनी एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तुमच्या जोडीदाराचीही काही स्वप्ने असतील जी पूर्ण करणे दोघांची जबाबदारी आहे. लग्नानंतर जोडीदाराचे स्वप्न आपले बनवा.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे