रायगड : उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने अनेक रोगांना बळी पडलेली खूप उदाहरणे आहेत. अशातच उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विषबाधा उघड्यावरचा शॉरमा खाऊन झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर गावामधील दिघोडे बस स्थानक जवळील उघड्यावर विकला जाणारा शॉरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी ( दि२८) रोजी रात्री घडली आहे. शॉरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने गावातील रवि क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी मुलांवर उपचार सुरू केले.सदरची विष बाधा ही शॉरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डॉ प्रकाश मेहता यांच्या तत्परतेने सदर रुग्णांचे प्राण वाचले आहेत. तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व उघड्यावर विक्री करणाऱ्या अशा व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…