Mumbai Airport : मुंबई विमानतळावर १६ तास प्रवाशांचे हाल

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विमानतळावर प्रवाशांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे.प्रवाशांना तब्बल १६ तास विमान उड्डाणाची वाट पाहावी लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.मुंबईतून इस्तांबूलला जाणारे सकाळी ६.३० वाजताचे विमान ८ तासानंतर थेट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.


प्रवाशांच्या माहितीनुसार, मुंबईहून इस्तंबूलला जाणारं हे विमान शनिवारी सकाळी ६.५५ ला टेकऑफ करणार होतं. सकाळी ८.२० पर्यंत विमानाचं टेक ऑफ होईल अस आधी सांगण्यात आलं. त्यानंतर साडे नऊ वाजता सर्व प्रवाशांना बोर्ड करण्यात आलं आणि विमानतळावरच बसवून ठेवलं गेलं. तास-दीड तास बसवल्यानंतर पुन्हा त्यांना एग्जिट घ्या असं सांगण्यात आलं. आता, अखेर साडे सोळा तासांनी रात्री ११.०० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याचे एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांनी पुन्हा साडेबारा वाजता विमानात बसवण्यात आलं.हे प्रवास रद्द का याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांची एयरपोर्ट मॅनेजर आणि इंडिगोच्या मॅनेजरला संपर्क साधण्याच प्रयत्न केला पण अद्याप काही उत्तर मिळालेलं नाही, असं प्रवाशांनी सांगितलं आहे. दरम्यान, या विमानानं १०० प्रवासी प्रवास करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इस्तंबूलमध्ये वातावरण थंड असल्यानं प्रवाशी थंडीचे कपडे घालून विमानात बसले होते पण विमानात बसवल्यानंतर दीड तास विना एसी बसून राहिले. पण आता प्रवाशांना सांगण्यात आलं आहे की हे विमान रद्द करण्यात येत आहे, मिळालेल्या माहितीनुसार कळते आहे.



आम्हाला खेद आहे की आमची फ्लाइट 6E17, मूळात मुंबई ते इस्तंबूलला चालवायची होती. मात्र, तांत्रिक समस्यांमुळे विमानसेवेला उशीर झाला. दुर्दैवाने, ही समस्या दुरुस्त करून ती गंतव्यस्थानी पाठवण्याचे आमचे सर्वतोपरी प्रयत्न असूनही, अखेरीस आम्हाला फ्लाइट रद्द करावी लागली, असे एअरलाईन्सने म्हटले आहे. कंपनीकडून आमच्या प्रवाशांना मदत व सहाय्य प्रदान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, निवास, जेवण आणि संपूर्ण परतावा यासारख्या उपायांची व्यवस्था करू. आमच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचण सोडवणे शक्य न झाल्याने विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकली नाही. दरम्यान, कंपनीकडून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता ते रात्री ११ :०० वाजता मुंबईतून रवाना होईल. आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की त्यांची सुरक्षितता हे आमच्यासाठी प्राधान्यवत आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे