WTC Final मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला, पाकिस्तानला हरवत मिळवले स्थान

मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासोबत दक्षिण आफ्रिका २०२५मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.


दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात २ विकेटनी हरवले.. एकवेळ अशी होती की दक्षिण आफ्रिकेचे ८ विकेट पडले होते. तेव्हा त्यांना ५०हून अधिक धावा हव्या होत्या. यावेळेस गोलंदाज मार्को यानसेन आणि रबाडाने चांगली कामगिरी करत संघाला फायनलमध्ये पोहोचवले.


तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२१ धावा हव्या होत्या. त्यांनी या दरम्यान ३ विकेट गमावल्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळादरम्यान एडन मार्करमने २२ धावांपासून फलंदाजी करण्यासाठी उतरला. मात्र तो ३७ धावा करून बाद झाला. तर टेंबा बावुमाने ४० धावांची खेळी केली. डेविड बेडिंग्हमने १४ धावा केल्या. अखेरीस मार्को यानसेन आणि कगिसो रबाडाने शानदार फलंदाजी केली. त्याच्या जोरावर संघाला विजय मिळवता आला. ट्रिस्टन स्टब्स १ धावा करून बाद झाला होता.


पाकिस्तानसाठी शानदार गोलंदाजी करताना मोहम्मद अब्बासने ६ विकेट आपल्या नावे केले. अब्बासने टोनी डी जॉर्जी, एडन मार्करम, ट्रिस्टन स्टब्स, टेंबा बावुमा, डेविड बेडिंग्हम आणि कोर्बिन बॉश यांना बाद केले. पाकिस्तानच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा आधीच मावळल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक संघ फायनलमध्ये दुसरे स्थान मिळवू शकतो.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण