TATA: टाटा समूह पुढील ५ वर्षात टाटा ५ लाख नोकऱ्या देणार

मुंबई : सरणारे २०२४ हे वर्ष अनपेक्षित राहिलं, हे वर्ष जागतिक पातळीवर राजकीय अस्थिरतेचं राहिलं. युक्रेन, गाझा पट्टी, सुदानमध्ये लष्करी संघर्ष दिसून आला. पश्चिम आशिया, आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि बांगलादेशमधील जनआंदोलनामुळे जगभरात तणावाची स्थिती होती.


दरम्यान रतन टाटा यांचं निधन आपल्या सर्वांसाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी मोठी हानी होती. ते दूरदर्शी व्यक्ती होते, त्यांनी एका पिढीच्या व्यवसायाला आकार दिला. असे असले तरी आगामी पाच वर्षात पाच लाख रोजगारांची निर्मिती करण्याबाबत विचार करत असल्याचं टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. नववर्षानिमित्त टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना चंद्रशेखरन यांनी एक पत्र लिहिलं आहे.


बॅटरी, सेमी कंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील उपकरणं यामध्ये नोकऱ्या कारखाने निर्मिती आणि योजनांमधील गुंतवणुकीतून निर्माण होणार आहेत. या पाच लाख नोकऱ्या सेवा क्षेत्रा व्यतिरिक्त असतील. टाटा ग्रुप गुजरातच्या ढोलेरामध्ये एक सेमी कंडक्टर प्रकल्प आणि आसाममध्ये सेमी कंडक्टर ओएसटी संयंत्र निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. टाटा ग्रुपच्या रिटेल क्षेत्रातील कंपन्यांचा विस्तार सुरु आहे. एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०२५ या वर्षाबाबत आशावादी असल्याचं देखील चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय