NCP : दिल्लीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची 'दादा'गिरी, ११ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अकरा उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. यासाठी पक्षाने विविध राज्यांच्या विधानसभा लढवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत चार मुसलमान उमेदवारांचा समावेश आहे.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आधी राष्ट्रीय पक्ष हा दर्जा होता. पण २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने आढावा घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेतला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्वात आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. लोकसभेत राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे हे एकमेव खासदार आहेत. तर राज्यसभेत राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, सुनेत्रा अजित पवार आणि नितीन पाटील हे खासदार आहेत.



कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळण्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतात ?

  1. लोकसभेतील किमान दोन टक्के जागा किमान तीन वेगवेगळ्या राज्यांतून जिंकणे आवश्यक

  2. लोकसभेत चार खासदार असावेत. तसेच चार राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळवणे आवश्यक

  3. किमान चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा




दिल्ली विधानसभा निवडणूक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी

  1. बुराडी - रतन त्याकी

  2. बादली - मुलायम सिंह

  3. मंगोल पुरी - खेमचंद

  4. चांदनी चौक - खालिद उर रहमान

  5. बल्लीमारान - मोहम्मद हारून

  6. छतरपूर - नरेंद्र तंवर

  7. संगम विहार - कमर अहमद

  8. ओखला - इमरान सैफी

  9. लक्ष्मी नगर - श्री नमा

  10. सीमा पुरी - राजेश लोहिया

  11. गोकल पुरी - जगदीश भगत


दिल्ली विधानसभा - एकूण जागा ७०
जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२५ मध्ये निवडणूक होण्याची शक्यता
Comments
Add Comment

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर