Manmohan Singh: निगमबोध घाटावर होणार मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी दिल्लीच्या निगमबोध घाटावर ११.४५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्य संस्काराचा कार्यक्रम गृहमंत्रालयाने जारी केला आहे. अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्री निगमबोध घाटावर पोहोचतील.


काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २८ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीस्थित एआयसीसी मुख्यालय येथून मनमोहन सिंग यांचे पार्थिव निगमबोध घाटाच्या दिशेने रवाना होईल. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्या कारणाने राष्ट्रपती भवनात शनिवारी होणार चेंज ऑफ गार्ड सेरेमनी होणार नाही. ही एक सैन्य परंपरा आहे. माजी पंतप्रधानांच्या सन्मनार्थ संपूर्ण देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान संपूर्ण देशात राष्ट्रध्वज झुकलेला राहील.



डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे देशाच्या अर्थकारणातील सरदार हरपल्याची भावना आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. १९९१ साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्थाही रुळावर आणली होती.

Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.