Ind vs Aus : भारत तीनशे पार, फॉलोऑन टळला

मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया(Ind vs Aus )यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारतीय संघ फलंदाजी करत असून भारताच्या संघाने ३०० पार धावसंख्या केली आहे. त्यांचे ७ विकेट बाद झाले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी मैदानावर टिच्चून फलंदाजी करत आहेत. भारताने तीनशे पार धावसंख्या नेल्याने त्यांच्यावरील फॉलोऑनचा धोका टळला आहे.


नितीश कुमार रेड्डीने शानदार अर्धशतक ठोकले आहे. तर वॉशिंग्टन सुंदरनेही चांगली साथ दिली आहे. त्याच्या जोरावर भारताला फॉलोऑन टाळता आला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. यात स्टीव्हन स्मिथने १४० धावांची शानदार खेळी केली. तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.


याआधी दुसऱ्या दिवशी भारताकडून पहिल्या डावाची सुरूवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवाल उतरले होते. मात्र रोहित शर्मा दुसऱ्याच षटकांत कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सच्या बॉलवर बाद झाला. तर केएल राहुल योग्य लयीत वाटत असतानाच तो पॅट कमिन्सच्या बॉलवर बोल्ड झाला.


यानंतर कोहली आणि यशस्वीने मिळून १०२ धावांची भागीदारी केली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात यशस्वी जायसवाल ८२ धावांवर बाद झाला. यानंतर विराट कोहलीही बाद झाला. त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीपही शून्यावर बाद झाला. या पद्धतीने यशस्वी, कोहली आणि आकाशदीप यांचे विकेट ६ धावांत पडले.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख