Skin Care: चेहऱ्यावरील पिंपल्स, त्याचे डाग असे करा दूर, वापरा हे उपाय

  73

मुंबई: चेहऱ्यावर पिंपल्स तसेच त्याचे डाग असतील तर चेहरा खराब दिसतो. यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील हे डाग कमी करू शकता.



मध


मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. मधामुळे त्वचा मुलायम होते. सोबतच त्वचेचा रंगही निखरतो. तुम्ही मधामध्ये साखर टाकून चेहरा स्क्रब करा आणि कोमट पाण्याने धुवा.



लिंबाचा रस


चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. लिंबूमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. यासाठी लिंबाच्या रसात थोडे पाणी मिसळा. त्यानंतर कापसाच्या मदतीने पिंपल्सच्या डागांवर लावा. पाच ते दहा मिनिटांनी हे धुवून घ्या.



कोरफडीचा गर


कोरफडीचा गर लावल्याने पिंपल्स त्याचे डाग या समस्या दूर होतात. तसेच कोरफड त्वचेचा मॉश्चराईज करण्याचेही काम करते. तसेच तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवते. तुम्ही डायरेक्ट चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.



दही


दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. यामुळे चेहऱ्याच्या समस्या कमी होतात. तुम्ही चेहऱ्यावरील डागधब्बे दूर करण्यासाठी दह्याचा वापर करू शकता. यासाठी दही चेहऱ्यावर लावा त्यानंतर अर्ध्या तासाने धुवा.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत