Dr. Manmohan Singh : पंतप्रधानांसह मान्यवरांकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि पुष्पांजली अर्पित केली.



पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज, शुक्रवारी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुष्पचक्र अर्पित केल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत संवाद साधला.





पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज, शुक्रवारी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुष्पचक्र अर्पित केल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत संवाद साधला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११. ४५ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. पहिलं उद्या सकाळी ८ वाजता डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवला काँग्रेसच्या मुख्यालयात आणलं जाणार आहे. त्यानंतर ८.३० ते ९.३० या वेळेत आम जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर असलेली डॉ. सिंग यांची लहान मुलगी आज सायंकाळपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. डॉ. मनमोहन सिंग याच्या निधनामुळे भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सरकारद्वारे आयोजित सर्व कार्यक्रम ७ दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च