Dr. Manmohan Singh : पंतप्रधानांसह मान्यवरांकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि पुष्पांजली अर्पित केली.



पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज, शुक्रवारी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुष्पचक्र अर्पित केल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत संवाद साधला.





पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज, शुक्रवारी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुष्पचक्र अर्पित केल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत संवाद साधला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११. ४५ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. पहिलं उद्या सकाळी ८ वाजता डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवला काँग्रेसच्या मुख्यालयात आणलं जाणार आहे. त्यानंतर ८.३० ते ९.३० या वेळेत आम जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर असलेली डॉ. सिंग यांची लहान मुलगी आज सायंकाळपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. डॉ. मनमोहन सिंग याच्या निधनामुळे भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सरकारद्वारे आयोजित सर्व कार्यक्रम ७ दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट