Manmohan Singh: अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला, देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Share

नवी दिल्ली: आपल्या आर्थिक सुधारणांच्या जोरावर अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या पथावर अग्रेसर करणारे भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव रात्रीच त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्राकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रयिगं गांधी , भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा हे एम्समध्ये पोहोचले. यावेळेस काँग्रेसची कर्नाटकच्या बेळगावात सुरू असलेली कार्यकारिणीची बैठकही रद्द करण्यात आले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे ही तातडीने एम्सच्या दिशेने निघाले आणि गुरूवारी मध्यरात्री पोहोचले.

एनसीपी(सपा)अध्यक्ष शरद पवार यांनीही गुरूवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, देशाने एक महान अर्थशास्त्री, दूरदर्शी सुधारक आणि राजकीय नेता गमावला आहे. ते पुढे म्हणले, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. आपल्या देशाने महान अर्थशास्त्रांपैकी एक दूरदर्शी सुधारक आणि जागतिक नेत्याला गमावले आहे. त्यांची पोकळी सतत जाणवेल. त्यांनी घालून दिलेला आदर्श अनेक पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक असेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

तेलंगणा सरकारकडून शुक्रवारी सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर तेलंगणा सरकारने शुक्रवारी सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थाने बंद राहणार आहे. एक आठवड्याचा राष्ट्रीय दुखवटा जाहीरही करण्यात आला आहे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

5 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

25 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

57 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago