इंदिरा गांधींमुळेच हिंदूंच्या लोकसंख्येत घट, जैन मुनींचा तर्क

इंदूर : इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना 'हम दो, हमारे दो' अशी घोषणा दिली. ही घोषणा हिंदू समाजाने अंमलात आणली पण देशातील इतर धर्मियांनी ही योजना अंमलात आणणे टाळले. आज एका धर्मियांची लोकसंख्या वाढत असताना हिंदूंच्या लोकसंख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. ही चिंतेची बाब आहे, असे जैन मुनी विनम्र सागर महाराज म्हणाले. हिंदूंमध्ये प्रामुख्याने आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले जात आहे. दिशाभूल करणारी माहिती देऊन, कधी धाक दाखवून तर कधी प्रलोभने दाखवून धर्मांतरण केले जात आहे.



जगात मुसलमानांचे ५० आणि ख्रिश्चनांचे १०० देश आहेत. भारतात बहुसंख्य हिंदू आहेत. भारतीयांनी त्यांचा २५ डिसेंबर हा आपलासा केला. एक सण म्हणून आनंदाने साजरा करायला सुरुवात केली. ज्यांचा गुरु किंवा देव या देशात जन्मला नाही त्यांचा २५ डिसेंबर आपण सर्वधर्म समभाव म्हणून साजरा करतो. प्रत्यक्षात २५ डिसेंबरच्या माध्यमातून आणि इतर वेगवेगळ्या प्रयत्नांतून हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंनी हे प्रकार ओळखणे आणि याला आळा घालणे आवश्यक आहे, असे जैन मुनी विनम्र सागर महाराज म्हणाले.

बघा : पाणीदार डोळ्यांसाठी करा 'हे' घरगुती उपाय


मागील काही दिवसांपासून अनेक संतमहंत, कथावाचक, प्रवचनकार हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी एकजूट होण्याचा संदेश देत आहेत. आता जैन मुनी पण हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सक्रीय होण्यास सांगत आहेत. जैन मुनी विनम्र सागर महाराज यांनी इंदूरच्या कार्यक्रमात बोलताना थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घोषणेचा उल्लेख केल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या