इंदिरा गांधींमुळेच हिंदूंच्या लोकसंख्येत घट, जैन मुनींचा तर्क

इंदूर : इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना 'हम दो, हमारे दो' अशी घोषणा दिली. ही घोषणा हिंदू समाजाने अंमलात आणली पण देशातील इतर धर्मियांनी ही योजना अंमलात आणणे टाळले. आज एका धर्मियांची लोकसंख्या वाढत असताना हिंदूंच्या लोकसंख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. ही चिंतेची बाब आहे, असे जैन मुनी विनम्र सागर महाराज म्हणाले. हिंदूंमध्ये प्रामुख्याने आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले जात आहे. दिशाभूल करणारी माहिती देऊन, कधी धाक दाखवून तर कधी प्रलोभने दाखवून धर्मांतरण केले जात आहे.



जगात मुसलमानांचे ५० आणि ख्रिश्चनांचे १०० देश आहेत. भारतात बहुसंख्य हिंदू आहेत. भारतीयांनी त्यांचा २५ डिसेंबर हा आपलासा केला. एक सण म्हणून आनंदाने साजरा करायला सुरुवात केली. ज्यांचा गुरु किंवा देव या देशात जन्मला नाही त्यांचा २५ डिसेंबर आपण सर्वधर्म समभाव म्हणून साजरा करतो. प्रत्यक्षात २५ डिसेंबरच्या माध्यमातून आणि इतर वेगवेगळ्या प्रयत्नांतून हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंनी हे प्रकार ओळखणे आणि याला आळा घालणे आवश्यक आहे, असे जैन मुनी विनम्र सागर महाराज म्हणाले.

बघा : पाणीदार डोळ्यांसाठी करा 'हे' घरगुती उपाय


मागील काही दिवसांपासून अनेक संतमहंत, कथावाचक, प्रवचनकार हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी एकजूट होण्याचा संदेश देत आहेत. आता जैन मुनी पण हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सक्रीय होण्यास सांगत आहेत. जैन मुनी विनम्र सागर महाराज यांनी इंदूरच्या कार्यक्रमात बोलताना थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घोषणेचा उल्लेख केल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment

Vietnamese President To Lam : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी पंतप्रधान मोदींची हैदराबाद हाऊसमध्ये भेट

नवी दिल्ली : तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आज हैदराबाद हाऊस येथे

Shimla Court : शिमला येथे न्यायालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी

“दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा पोस्टरमधून इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तीन

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या