Accident: घाटकोपरमध्ये टेम्पो चालकाने ५ ते ६ जणांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात घडलेल्या बेस्ट बसच्या अपघाताच्या घटनेला काही दिवस होत नाहीतच तोच पुन्हा घाटकोपरमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.


रस्त्यावरून हा टेम्पो भरधाव वेगात जात होता. या भरधाव टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



घाटकोपरच्या या परिसरात हा टेम्पो आझाद नगरहून मच्छी मार्केटच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. यावेळी पाच ते सहा जणांना चिरडलं. हा गाडीचालक नशेत होता. त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्याने पाच ते सहा जणांना धडक दिली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रायव्हरला नागरिकांनी पकडलं असता. पोलीस आल्यानंतर त्यांनी गाडीचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा टेम्पोचा ड्रायव्हर आझादनगर येथून आला होता. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झालेत.


आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर, मुंबई येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात, वय २५ वर्ष, हा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणा-या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली.


सदर अपघातामध्ये प्रीती रितेश पटेल ही ३५ वर्षीय महिला राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन महिला व एक पुरुष रेश्मा शेख, वय २३ वर्ष, मारूफा शेख वय २७ वर्ष, तोफा उजहर शेख, वय ३८ वर्षे आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय २८ वर्षे, सर्व जण राहणार चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट, घाटकोपर पश्चिम यांना मुका मार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे.



कुर्ला दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू


काही दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात एका भरधाव बसने अनेक लोकांना चिरडले होते. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता तर ३३ जण जखमी झाले होते.
Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक