Accident: घाटकोपरमध्ये टेम्पो चालकाने ५ ते ६ जणांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात घडलेल्या बेस्ट बसच्या अपघाताच्या घटनेला काही दिवस होत नाहीतच तोच पुन्हा घाटकोपरमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.


रस्त्यावरून हा टेम्पो भरधाव वेगात जात होता. या भरधाव टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



घाटकोपरच्या या परिसरात हा टेम्पो आझाद नगरहून मच्छी मार्केटच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. यावेळी पाच ते सहा जणांना चिरडलं. हा गाडीचालक नशेत होता. त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्याने पाच ते सहा जणांना धडक दिली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रायव्हरला नागरिकांनी पकडलं असता. पोलीस आल्यानंतर त्यांनी गाडीचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा टेम्पोचा ड्रायव्हर आझादनगर येथून आला होता. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झालेत.


आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर, मुंबई येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात, वय २५ वर्ष, हा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणा-या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली.


सदर अपघातामध्ये प्रीती रितेश पटेल ही ३५ वर्षीय महिला राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन महिला व एक पुरुष रेश्मा शेख, वय २३ वर्ष, मारूफा शेख वय २७ वर्ष, तोफा उजहर शेख, वय ३८ वर्षे आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय २८ वर्षे, सर्व जण राहणार चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट, घाटकोपर पश्चिम यांना मुका मार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे.



कुर्ला दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू


काही दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात एका भरधाव बसने अनेक लोकांना चिरडले होते. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता तर ३३ जण जखमी झाले होते.
Comments
Add Comment

समुद्रमार्गाने गाठा कोकणाची वाट; मुंबई–विजयदुर्ग रो रो फेरी १ मार्चपासून सेवेत; जाणून घ्या वेळ आणि तिकीट

मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी समुद्रमार्गाचा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे. मुंबई ते विजयदुर्ग

२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

मुंबई : भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा

भाजपा आमदाराची धडक कारवाई! पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती

- मुंबईच्या चारकोपमध्ये पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती मुंबई : भाजपा आमदाराकडून चारकोप परिसरात मोठी

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी २५ फेब्रुवारीला

मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारी रोजी पर्यंत मांडला न गेल्याने आता स्थायी समिती

सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांची जागा ठरली

गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांना सभागृहात बसवून जागा केली निश्चित मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये

ती पुन्हा येतेय! मुंबईत नवीन अद्ययावत मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार...

मुंबई : आधुनिकीकरण करण्यासाठी मुंबईतली मोनोरेलची सेवा सप्टेंबर २०२५ मध्ये बंद करण्यात आली. ही सेवा मे २०२६ किंवा