Accident: घाटकोपरमध्ये टेम्पो चालकाने ५ ते ६ जणांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात घडलेल्या बेस्ट बसच्या अपघाताच्या घटनेला काही दिवस होत नाहीतच तोच पुन्हा घाटकोपरमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.


रस्त्यावरून हा टेम्पो भरधाव वेगात जात होता. या भरधाव टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



घाटकोपरच्या या परिसरात हा टेम्पो आझाद नगरहून मच्छी मार्केटच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. यावेळी पाच ते सहा जणांना चिरडलं. हा गाडीचालक नशेत होता. त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्याने पाच ते सहा जणांना धडक दिली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रायव्हरला नागरिकांनी पकडलं असता. पोलीस आल्यानंतर त्यांनी गाडीचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा टेम्पोचा ड्रायव्हर आझादनगर येथून आला होता. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झालेत.


आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर, मुंबई येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात, वय २५ वर्ष, हा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणा-या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली.


सदर अपघातामध्ये प्रीती रितेश पटेल ही ३५ वर्षीय महिला राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन महिला व एक पुरुष रेश्मा शेख, वय २३ वर्ष, मारूफा शेख वय २७ वर्ष, तोफा उजहर शेख, वय ३८ वर्षे आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय २८ वर्षे, सर्व जण राहणार चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट, घाटकोपर पश्चिम यांना मुका मार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे.



कुर्ला दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू


काही दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात एका भरधाव बसने अनेक लोकांना चिरडले होते. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता तर ३३ जण जखमी झाले होते.
Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका