Tamilnadu :'द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार'

कोईम्बतूर : द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार, पायात काहीही घालणार नाही; अशी भीष्मप्रतिज्ञा भाजपाचे तामिळनाडू अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली आहे. ही भीष्मप्रतिज्ञा करताना पत्रकारांसमोरच के. अण्णामलाई यांनी पायातले बूट काढून हातात धरले आणि आता सत्ता आल्याशिवाय पु्न्हा चप्पल किंवा बूट वापरणार नसल्याचे जाहीर केले.



अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात कारवाई झालेली नाही. ही गंभीर बाब आहे. या प्रकरणात सरकारला आणि विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणार आहे, असे सांगत के. अण्णामलाई यांनी भाजपा आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.


स्वतःच्या घरासमोर शुक्रवारी आंदोलन करणार आणि स्वतःला चाबकाचे सहा फटके मारून घेणार. तसेच शुक्रवारपासून सलग ४८ दिवस उपवास करणार आहे. न्यायासाठी सहा हातांच्या मुरुगन (कार्तिकेय / गणपतीचा भाऊ) देवाला प्रार्थना करणार. यानंतर भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरासमोर सरकार विरोधात आंदोलन केले जाईल; असे के. अण्णामलाई यांनी जाहीर केले.


याआधी अण्णा विद्यापीठ प्रकरणी आंदोलन करत असलेल्या द्रमुकच्या राजकीय विरोधकांवर पोलिसांनी कारवाई केली. अण्णाद्रमुकचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यानंतर भाजपाचे आंदोलन सुरू होताच तिथे पण पोलिसांनी कारवाई केली. आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन के. अण्णामलाई यांनी द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार; अशी भीष्मप्रतिज्ञा केली.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात