Tamilnadu :'द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार'

कोईम्बतूर : द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार, पायात काहीही घालणार नाही; अशी भीष्मप्रतिज्ञा भाजपाचे तामिळनाडू अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली आहे. ही भीष्मप्रतिज्ञा करताना पत्रकारांसमोरच के. अण्णामलाई यांनी पायातले बूट काढून हातात धरले आणि आता सत्ता आल्याशिवाय पु्न्हा चप्पल किंवा बूट वापरणार नसल्याचे जाहीर केले.



अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात कारवाई झालेली नाही. ही गंभीर बाब आहे. या प्रकरणात सरकारला आणि विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणार आहे, असे सांगत के. अण्णामलाई यांनी भाजपा आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.


स्वतःच्या घरासमोर शुक्रवारी आंदोलन करणार आणि स्वतःला चाबकाचे सहा फटके मारून घेणार. तसेच शुक्रवारपासून सलग ४८ दिवस उपवास करणार आहे. न्यायासाठी सहा हातांच्या मुरुगन (कार्तिकेय / गणपतीचा भाऊ) देवाला प्रार्थना करणार. यानंतर भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरासमोर सरकार विरोधात आंदोलन केले जाईल; असे के. अण्णामलाई यांनी जाहीर केले.


याआधी अण्णा विद्यापीठ प्रकरणी आंदोलन करत असलेल्या द्रमुकच्या राजकीय विरोधकांवर पोलिसांनी कारवाई केली. अण्णाद्रमुकचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यानंतर भाजपाचे आंदोलन सुरू होताच तिथे पण पोलिसांनी कारवाई केली. आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन के. अण्णामलाई यांनी द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार; अशी भीष्मप्रतिज्ञा केली.

Comments
Add Comment

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने