Tamilnadu :'द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार'

कोईम्बतूर : द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार, पायात काहीही घालणार नाही; अशी भीष्मप्रतिज्ञा भाजपाचे तामिळनाडू अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली आहे. ही भीष्मप्रतिज्ञा करताना पत्रकारांसमोरच के. अण्णामलाई यांनी पायातले बूट काढून हातात धरले आणि आता सत्ता आल्याशिवाय पु्न्हा चप्पल किंवा बूट वापरणार नसल्याचे जाहीर केले.



अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात कारवाई झालेली नाही. ही गंभीर बाब आहे. या प्रकरणात सरकारला आणि विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणार आहे, असे सांगत के. अण्णामलाई यांनी भाजपा आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.


स्वतःच्या घरासमोर शुक्रवारी आंदोलन करणार आणि स्वतःला चाबकाचे सहा फटके मारून घेणार. तसेच शुक्रवारपासून सलग ४८ दिवस उपवास करणार आहे. न्यायासाठी सहा हातांच्या मुरुगन (कार्तिकेय / गणपतीचा भाऊ) देवाला प्रार्थना करणार. यानंतर भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरासमोर सरकार विरोधात आंदोलन केले जाईल; असे के. अण्णामलाई यांनी जाहीर केले.


याआधी अण्णा विद्यापीठ प्रकरणी आंदोलन करत असलेल्या द्रमुकच्या राजकीय विरोधकांवर पोलिसांनी कारवाई केली. अण्णाद्रमुकचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यानंतर भाजपाचे आंदोलन सुरू होताच तिथे पण पोलिसांनी कारवाई केली. आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन के. अण्णामलाई यांनी द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार; अशी भीष्मप्रतिज्ञा केली.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे