Health: थंडीच्या दिवसांत नाही वाढणार वजन, दररोजच्या डाएटमध्ये सामील करा हे ६ पदार्थ

मुंबई: थंडीचे दिवस आले की अंथरुणातून उठायचे मन करत नाही. दिवसभर रजई अंगावर ओढून घ्यावेसे वाटते. अनेकजण तर लोळतच पडलेले असतात. अशातच फिजीकल अॅक्टिव्हिटी कमी होते आणि अधिक खाणे होत असल्याने त्याचा परिणाम वजनावर होतो. येथे काही स्न्रॅक्सचे प्रकार आहेत जे तुम्ही डाएटमध्ये सामील करू शकता आणि अगदी सहज वजन घटवू शकता.


प्रोटीन्स आणि फायबर्सनी भरपूर भाजलेले छोले ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने पोट चांगल्या पद्धतीने भरते. शिजवलेले चणे ऑलिव्ह ऑईल, पेपरिका आणि एक चिमूट मिठासोबत मिसळून कुरकुरीत होईपर्यंत भाजा. यातील फायबर पाचनतंत्राला चांगले बनवते आणि पोटाला दीर्घकाळ भरलेले ठेवते.


ग्रीन टी, बदामाचे दूध आणि दालचिनी अथवा वेलचीसोबत बनवून प्यायल्याने शरीरातील कॅलरी कमी आणि अँटीऑक्सिडंट अधिक मिळतात. ग्रीन टीमधील कॅफेन आणि कॅटेचिन फॅट बर्न करण्यास आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात.यामुळे वजन वेगाने कमी होऊ शकते.


बदाम, अक्रोड आणि कद्दूच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि गरजेची पोषकतत्वे असतात. यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते. यात मिरची पावडर आणि दालचिनीसोबत हलके भाजून खा. यामुळे वजन नियंत्रित राहते.


रताळ्यामध्ये फायबर, व्हिटामिन ए आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. रताळ्याचे पातळ काप करून ऑलिव्ह ऑईलमध्ये बेक करा. यामुळे शरीर हेल्दी आणि फिट राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि