मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीष महाजन यांनी आज, गुरुवार (२६ डिसेंबर) मंत्रालयात जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री म्हणून आपला कार्यभार स्वीकारला. यावेळी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. दिपक कपुर, सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय बेलसरे, लोहा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रताप पाटील चिखलीकर यांचे समवेत विविध विभागीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि महाराष्ट्र शासनाच्या आगामी ध्येय धोरणांबाबतीत चर्चा केली.
गिरीष महाजन यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच विभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. जलसंपदा क्षेत्रातील प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना विभागाच्या सध्याच्या कार्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. या वेळी महाजन यांनी नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला अधिक कार्यक्षम बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
Virat Kohli : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला धक्का देणाऱ्या विराट कोहलीला सामनाधिकाऱ्यांचा दणका
महाजन हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग सातव्यांदा आमदार असून, राज्याच्या राजकारणात त्यांचा मोठा अनुभव आहे. गिरीश महाजन यांच्या या नव्या कार्यकाळात, जलव्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षेत्रात लक्षणीय प्रगती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यभार स्वीकारण्याचे क्षण
मंत्रालयात महाजन यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते. उत्साहाच्या वातावरणात त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीची सुरुवात केली.
आज मंत्रालयात राज्याच्या जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले स्वागत व सन्मान स्वीकारून सर्वांचे आभार व्यक्त केले.#मंत्रालय #मुंबई pic.twitter.com/quwggB13Kp
— Girish Mahajan (@girishdmahajan) December 26, 2024
आगामी उद्दिष्टे
1. जलसंपदा प्रकल्पांना गती देणे.
2. आपत्ती व्यवस्थापन प्रणाली बळकट करणे.
3. शेतकऱ्यांसाठी जलस्रोतांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे.