Mumbai Metro 9 : मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात; लवकरच नागरिकांचा होणार सुकर प्रवास!

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे (Mumbai Metro) पसरल्यापासून लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण मेट्रोने प्रवास करतात. अशातच विरारकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ (Metro 9) मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच मेट्रो ९ चा पहिला टप्पा अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून विरारकरांना गर्दीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असा दुसरा टप्पा असणार आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सहा महिन्यात या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत या मेट्रोला पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



कसा असेल पहिला टप्पा?


एमएमआरडीएकडून (MMRDA) पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावदरम्यानच्या मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. या मार्गातील कामे अंतिम टप्प्यात आहे. तर रुळांची कामे सुरू आहेत. आता यंत्रणेचीही कामे लवकरच सुरु केली जाणार आहेत. मेट्रो ९च्या पहिल्या टप्प्यात ४ स्थानके असणार आहेत. दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव ही स्थानके असणार आहे.


मेट्रो ९ मार्गिका मेट्रो मार्ग २ ए (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग (अंधेरी पूर्व ते दहिसर) पूर्वेला थेट जोडण्यात येणार आहे. तसेच या मेट्रो मार्गिकेमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न रेल्वेला देखील जोडण्यात येईल.



मेट्रो ९ मार्गिकेवरील स्थानके कोणती?


दहिसर, पांडुरंग वाडी, मिरागाव, काशीगाव, साई बाबा नगर, मेदितिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम.

Comments
Add Comment

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा

मुंबई: बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला

एसटीच्या मोबाईल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना मोठा दिलासा: मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख, गुरांसाठीही मदत

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर,

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा

मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग

शाहरुख व गौरी खानविरुद्ध मानहानीचा खटला, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस अधिकारी

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सची पर्वा नाही, म्हणतात, त्यांना त्यासाठी पैसे मिळतात..

अमृता फडणवीस यांची परखड मुलाखत! मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता