Mumbai Metro 9 : मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात; लवकरच नागरिकांचा होणार सुकर प्रवास!

  439

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे (Mumbai Metro) पसरल्यापासून लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण मेट्रोने प्रवास करतात. अशातच विरारकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ (Metro 9) मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच मेट्रो ९ चा पहिला टप्पा अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून विरारकरांना गर्दीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असा दुसरा टप्पा असणार आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सहा महिन्यात या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत या मेट्रोला पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



कसा असेल पहिला टप्पा?


एमएमआरडीएकडून (MMRDA) पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावदरम्यानच्या मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. या मार्गातील कामे अंतिम टप्प्यात आहे. तर रुळांची कामे सुरू आहेत. आता यंत्रणेचीही कामे लवकरच सुरु केली जाणार आहेत. मेट्रो ९च्या पहिल्या टप्प्यात ४ स्थानके असणार आहेत. दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव ही स्थानके असणार आहे.


मेट्रो ९ मार्गिका मेट्रो मार्ग २ ए (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग (अंधेरी पूर्व ते दहिसर) पूर्वेला थेट जोडण्यात येणार आहे. तसेच या मेट्रो मार्गिकेमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न रेल्वेला देखील जोडण्यात येईल.



मेट्रो ९ मार्गिकेवरील स्थानके कोणती?


दहिसर, पांडुरंग वाडी, मिरागाव, काशीगाव, साई बाबा नगर, मेदितिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम.

Comments
Add Comment

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये