Mumbai Metro 9 : मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात; लवकरच नागरिकांचा होणार सुकर प्रवास!

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे (Mumbai Metro) पसरल्यापासून लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण मेट्रोने प्रवास करतात. अशातच विरारकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ (Metro 9) मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच मेट्रो ९ चा पहिला टप्पा अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून विरारकरांना गर्दीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असा दुसरा टप्पा असणार आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सहा महिन्यात या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत या मेट्रोला पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



कसा असेल पहिला टप्पा?


एमएमआरडीएकडून (MMRDA) पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावदरम्यानच्या मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. या मार्गातील कामे अंतिम टप्प्यात आहे. तर रुळांची कामे सुरू आहेत. आता यंत्रणेचीही कामे लवकरच सुरु केली जाणार आहेत. मेट्रो ९च्या पहिल्या टप्प्यात ४ स्थानके असणार आहेत. दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव ही स्थानके असणार आहे.


मेट्रो ९ मार्गिका मेट्रो मार्ग २ ए (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग (अंधेरी पूर्व ते दहिसर) पूर्वेला थेट जोडण्यात येणार आहे. तसेच या मेट्रो मार्गिकेमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न रेल्वेला देखील जोडण्यात येईल.



मेट्रो ९ मार्गिकेवरील स्थानके कोणती?


दहिसर, पांडुरंग वाडी, मिरागाव, काशीगाव, साई बाबा नगर, मेदितिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम.

Comments
Add Comment

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी

‘एआय’, डिजिटल सुविधा आणि विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क