Kaun Banega Crorepati 16: पत्नी जया बच्चन यांच्याकडून पैसे मागतात अमिताभ बच्चन

मुंबई: कौन बनेगा करोडपती १६(Kaun Banega Crorepati 16) हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या शोमध्ये अमिताभ बच्चन आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टीही शेअर करत असतात. अमिताभ बच्चन प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत असतात नुकतीच त्यांनी आपल्या पत्नीबद्दलची एक गोष्ट सांगितले.


जेव्हा एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या दररोज मिडल क्लास फॅमिलीच्या संबंधित प्रश्न विचारले तेव्हा अमिताभ यांनी मजेशीर उत्तरे दिली.


तुमचं घर एवढं मोठं आहे, रिमोट हरवलं तर ते कसं शोधता.". या प्रश्नापासून सुरुवात झाली. शीघ्र विनोदासाठी प्रसिद्ध असलेले अमिताभ बच्चन म्हणाले, "मी थेट सेट टॉप बॉक्सजवळ जाऊन त्याद्वारे कंट्रोल करतो.."


पुढच्या संवादात स्पर्धकाने मध्यम वर्गीय कुटुंबासंबंधी आणखी प्रश्न विचारले. या प्रश्नांमुळे प्रश्नमंजुषेच्या या कार्यक्रमात हास्यकल्लोळ उडाला. प्रियंकाने विचारले, "सर, मध्यमवर्गीय कुटुंबात रिमोट हरवलं तर भांडणं होतात. तुमच्याकडेही असं होतं का?".. अमिताभ बच्चन म्हणाले, "नही देवी जी... हमारे घर में ऐसा नही होता.. सोफें पर दोन तकिये होते है.. रिमोट उस में छुप जाता है.. बस वहीं ढुंढना पडता है.."


प्रियंकाने पुढचा प्रश्न विचारला, "मी ऑफिसमधून घरी जाते तेव्हा मम्मी सांगते, येताना कोथिंबीर आण.. जया मॅडम तुम्हालाही असं काही आणायला सांगतात का? " अमिताभ बच्चन म्हणाले, " हो सांगतात ना.. तुम्ही स्वत:ला घरी आणा.."


प्रियंकाने शेवटचा प्रश्न विचारला, "सर, एटीएममधून कॅश काढायची असताना तुम्ही कधी बॅलेन्स चेक केलंय का?" अमिताभ बच्चन यांनी तत्काळ उत्तर दिलं, "मी माझ्याकडे कॅश बाळगतच नाही.. आणि मी कधी एटीएममध्येही गेलो नाही. ते कसं वापरतात, हे मला कळत नाही. पण जयाजींकडे कॅश असते.मी त्यांनाच पैसे मागतो. जयाजींना गजरा खूप आवडतो. तर रस्त्यात मी लहान मुलाकडून गजरा विकत घेतो. तो गजरा कधी जयाजींना देतो तर कधी गाडीतच ठेवतो. कारण त्याचा सुगंध मला खूप आवडतो.. "


प्रियंकाचे खेळकर प्रश्न आणि मि. अमिताभ बच्चन यांची चपखल उत्तरं यामुळे हा एपिसोड विनोद आणि भावनिक क्षणांनी भारलेला ठरला. कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम कोट्यवधी लोकांना का आवडतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

Comments
Add Comment

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी