१४७ वर्षात पहिल्यांदा...मेलबर्न कसोटीत भारत रचणार इतिहास?

मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ सध्या रोमहर्षक वळणावर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना असणार आहे. हा कसोटी सामना जिंकत भारत आपल्या नावावर एक खास रेकॉर्ड करू शकतो. हा रेकॉर्ड करताना टीम इंडिया १९८५मध्ये चुकली होती.



काय आहे तो खास रेकॉर्ड


मेलबर्नमध्ये भारताचा रेकॉर्ड आतापर्यंत मिळताजुळता राहिला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळवण्यात आले. यातील ऑस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले तर भारताने चार सामने जिंकलेत. दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिले. मात्र टीम इंडिया या मैदानावर आतापर्यंत विजयाची हॅटट्रिक लावू शकलेली नाह. दरम्यानच्या, हल्लीच्या वर्षांमध्ये भारतीय संघाचे भारतीय संघाची कामगिरी मेलबर्नमध्ये मजबूत राहिली आहे यामुळे चाहते आणि संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.


भारत मेलबर्न कसोटीत २०१८ला १३७ धावांनी जिंकण्यात यशस्वी ठरला होता. यानंतर भारताने मेलबर्न कसोटी २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेटनी हरवले. मेलबर्नमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. आता टीम इंडिया मेलबर्न २०२४ कसोटी जिंकत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विजयी हॅटट्रिकचा रेकॉर्ड बनवू शकते.

Comments
Add Comment

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि