१४७ वर्षात पहिल्यांदा...मेलबर्न कसोटीत भारत रचणार इतिहास?

मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ सध्या रोमहर्षक वळणावर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना असणार आहे. हा कसोटी सामना जिंकत भारत आपल्या नावावर एक खास रेकॉर्ड करू शकतो. हा रेकॉर्ड करताना टीम इंडिया १९८५मध्ये चुकली होती.



काय आहे तो खास रेकॉर्ड


मेलबर्नमध्ये भारताचा रेकॉर्ड आतापर्यंत मिळताजुळता राहिला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळवण्यात आले. यातील ऑस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले तर भारताने चार सामने जिंकलेत. दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिले. मात्र टीम इंडिया या मैदानावर आतापर्यंत विजयाची हॅटट्रिक लावू शकलेली नाह. दरम्यानच्या, हल्लीच्या वर्षांमध्ये भारतीय संघाचे भारतीय संघाची कामगिरी मेलबर्नमध्ये मजबूत राहिली आहे यामुळे चाहते आणि संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.


भारत मेलबर्न कसोटीत २०१८ला १३७ धावांनी जिंकण्यात यशस्वी ठरला होता. यानंतर भारताने मेलबर्न कसोटी २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेटनी हरवले. मेलबर्नमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. आता टीम इंडिया मेलबर्न २०२४ कसोटी जिंकत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विजयी हॅटट्रिकचा रेकॉर्ड बनवू शकते.

Comments
Add Comment

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने