१४७ वर्षात पहिल्यांदा...मेलबर्न कसोटीत भारत रचणार इतिहास?

मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ सध्या रोमहर्षक वळणावर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना असणार आहे. हा कसोटी सामना जिंकत भारत आपल्या नावावर एक खास रेकॉर्ड करू शकतो. हा रेकॉर्ड करताना टीम इंडिया १९८५मध्ये चुकली होती.



काय आहे तो खास रेकॉर्ड


मेलबर्नमध्ये भारताचा रेकॉर्ड आतापर्यंत मिळताजुळता राहिला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळवण्यात आले. यातील ऑस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले तर भारताने चार सामने जिंकलेत. दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिले. मात्र टीम इंडिया या मैदानावर आतापर्यंत विजयाची हॅटट्रिक लावू शकलेली नाह. दरम्यानच्या, हल्लीच्या वर्षांमध्ये भारतीय संघाचे भारतीय संघाची कामगिरी मेलबर्नमध्ये मजबूत राहिली आहे यामुळे चाहते आणि संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.


भारत मेलबर्न कसोटीत २०१८ला १३७ धावांनी जिंकण्यात यशस्वी ठरला होता. यानंतर भारताने मेलबर्न कसोटी २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेटनी हरवले. मेलबर्नमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. आता टीम इंडिया मेलबर्न २०२४ कसोटी जिंकत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विजयी हॅटट्रिकचा रेकॉर्ड बनवू शकते.

Comments
Add Comment

'सूर्या'सेनेचा विजयाचा श्रीगणेश, पहिल्याच सामन्यात अमेरिकेला चारली धूळ

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर अमेरिकेचा २९ धावांनी पराभव

सूर्यकुमारने टी ट्वेंटी विश्वचषकात केला मोठा विक्रम

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान

अमेरिकेच्या एका गोलंदाजासमोर ढेपाळली भारताची फलंदाजी

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी एका गोलंदाजासमोर पुरती ढेपाळली.

प्रहार टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा २०२६

प्रहार टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा २०२६ या आर्टिकलमध्ये दिलेला क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करा. दिलेल्या प्रश्नाला

सलामीवीर अभिषेक शर्मा केला भलताच विक्रम

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक

टी-२० विश्वचषक: वेस्ट इंडीजची विजयी सलामी, शेफर्ड आणि हेटमायर चमकले

कोलकाता : दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडीज संघाने आपल्या टी-२० विश्वचषक २०२६ मोहिमेची दणक्यात सुरुवात केली