Weather Forecast : उत्तर भारतात गारा पडणार, देशात थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी उत्तर भारतात गारा पडण्याची आणि देशात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांतील निवडक भागांमध्ये गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात शुक्रवारी गारा पडण्याची शक्यता जास्त असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या वाऱ्यामुळे मध्य भारतात आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे थंडीचा जोर वाढेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वेगवेगळ्या भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. या पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. आता हवामान विभागाने दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.



पुढील दोन - चार दिवस पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश ही राज्य धुक्याच्या चादरीमुळे झाकोळली जातील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दाट धुके असल्यास नागरिकांनी महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर पडल्यास शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निवडून प्रवास करावा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



दाट धुके आणि थंडीची लाट यामुळे राजधानी दिल्लीत पारा घसरला. सकाळच्या वेळेत दृश्यमानतेचे प्रमाणही कमी झाले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास दिल्लीत दृश्यमानता शंभर मीटरपेक्षा कमी होती. कर्तव्य पथ, जनपथ, द्वारका, इंडिया गेट या भागांमध्ये सकाळी तापमान दहा अंश से. पेक्षा कमी होते.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला