virar Accident : चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी गेली अन् थोडक्यात वाचला जीव!

मुंबई : सध्या सातत्याने हिट अँड रनच्या घटना समोर येत असताना वसईमध्येही अशीच एक घटना घडल्याचे समोर (virar Accident) आले आहे. एका चिमुकल्याच्या अंगावरुन कार गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर या प्रकारानंतर चालकही फरार झाला आहे.


आज सकाळी १० वाजून २१ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वाळीव येथे मोकळ्या जागेत एम.एच. ०१ ई एम ३२४५ या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन बुक करुन मागवली होती. त्याचठिकाणी राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू (५) हा मुलगा खेळत असताना कारचालकाने कार बेदराकपणे चालवत पुढे मुलगा बसलेला असल्याच न बघता त्याच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला.



या घटनेनंतर स्थानिकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ही न ऐकता तेथून निघून गेला. तसेच तेथील लोकांनी ज्याने ओला बुक केली होती त्याच्याशी संपर्क साधला. त्याने ही आपण कार चालकाला घेवून येतो असे सांगत मोबाईलच स्वीच ऑफ केल्याची माहिती तेथील नागरीकांनी दिली आहे.


दरम्यान, सध्या लहानग्याला वाळीवच्या वालवादेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हाताला, डोक्याला, छातीला दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तसेच या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील