Inter Caste Marriage : आंतरजातीय लग्न केल्यावर ५० हजारांचे अनुदान मिळणार

  148

मुंबई : आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्यास शासनाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षातील प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देऊन काही जोडप्यांना अनुदान देण्यात आले आहे, तर नव्याने अर्ज केलेल्यांना अनुदानाची आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे.


राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत १९५८ पासून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. या समाज कल्याण विभागाकडून केली जाते.योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग यापैकी एका व्यक्तीने सवर्ण हिंदू लिंगायत, जैन व शीख या व्यक्तीशी विवाह केल्यास अथवा दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील व्यक्तींनी विवाह केल्यास ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. या योजनेची जनजागृती केली जात आहे.विवाहित जोडप्यापैकी एक जण हा अनुसूचित जाती, अनुसूचित जामाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. जातीचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र, लग्नाचा फोटो लागतो. जातिभेद निर्मूलनासाठी ही योजना राबविली जात आहे.


असे मिळते अनुदान


प्रस्ताव प्राप्त होताच त्याची छाननी करून पात्र ठरलेल्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते. आंतरजातीय विवाह केल्यानंतर निकषानुसार पात्र लाभार्थीची निवड करून पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात ५० हजारांचे अनुदान समाज कल्याण विभागाकडून वर्ग केले जाते. शासनाकडे निधीची मागणी केली जाते आहे. निधी उपलब्ध होताच जोडप्यांच्या बँक खात्यात हे अनुदान वर्ग केले जाते.



काय आहे आंतरजातीय विवाह अनुदान योजना?


अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरु केली आहे.

Comments
Add Comment

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे