नवरी बनलेल्या पी.व्ही. सिंधूने लग्नात केली धमाल, शेअर केले फोटो

मुंबई: भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू २२ डिसेंबरला उदयपूर येथे लग्नबंधनात अडकली. तिचे लग्न हैदराबादच्या वेंकट दत्ता साईशी झाले. वेंकट पोसाईडेक्स टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत. सिंधूने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


सिंधूने पोस्टमध्ये केवळ हार्ट इमोजी शेअर केला आहे. ती या फोटोजमध्ये वेंकट दत्तासोबत लग्न एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या लग्नाचे सेलीब्रेशन २० डिसेंबरपासून संगीत सोहळ्यापासून सुरू झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी हळद, मेहंदी हे विधी झाले.


सिंधुने लग्नाच्या दिवशी क्रीम रंगाची साडी नेसली होती. तर नवऱ्यामुलाने मळखाऊ क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. सिंधुचे वडील पीव्ही रमणा यांच्या मते दोन्ही कुटुंबातील लोक एकमेकांना ओळखत होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच हे ठरले.


 


वेंकट दत्ता साईबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी फाऊंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन येथून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस/लिबरल स्टडीजमध्ये डिप्लोमा केला आहे.


त्यांनी २०१८मध्ये फ्लेम युनिर्व्हसिटी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन येथून बीबीए अकाऊंटिंग अँड फायनान्स पूर्ण केले आहे.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.