Health Tips: थंडीच्या दिवसांत पाणी कमी पिताय? शरीरामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: प्रत्येक मोसमात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. थंडी येताच बरेचजण गरम पदार्थ खाण्यास सुरूवात करतात. चहा-कॉफीचे सेवन अधिक करू लागतात. तसेच पाण्याचे सेवन मात्र कमी होते. थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते. याच कारणामुळे लोक आपल्या लिक्विड डाएटवर लक्ष देत नाहीत. थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज नाही असे नाही तर या दिवसांतही शरीराला पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मेंदूच्या कोशिका आकुंचन पावू लागतात. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.



ही दिसतात लक्षणे


कोरडी त्वचा: थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्यायल्यास त्वचा कोरडी होऊ लागते. थंडीत त्वचा कोरडी होणे सामान्य बाब आहे. मात्र असे अनेकदा होते की त्वचेवर खपलीसारखी होते. हे मात्र पाणी कमी असण्याचे लक्षण आहे. जे लोक दीर्घकाळापासून पाणी कमी पितात त्यांची त्वचा रूक्ष असतात. थंडीच्या दिवसांत ही समस्या अधिक वाढते.


लघवी पिवळी होणे - जर लघवीचा रंग पिवळा असेल, कमी होत असेल अथवा लघवीजवळ जळजळ होत असेल तर समजून जा की शरीरात पाण्याची कमतरता आहे. कमी पाणी प्यायल्याने लगेचच लघवीवर परिणाम होतो.


तोंड सुकणे - जर तुमचे ओठ खूप कोरडे पडत असतील. सतत सुकत असतील अथवा घसा सुकत असेल तर तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवते. जर तोंड सतत सुकत असेल तर समजून जा की शरीरात पाण्याची कमतरता आहे.


हृदयाकडे जडपणा - दीर्घकाळापासून तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर रक्ताच्या प्रमाणावरही परिणााम होतो. अशातच हृदयाला रक्ताचा पुरवठा करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे हृदयावर जोर पडतो.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे